महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरकारला या जन्मात तरी शेतकऱ्यांचे दु:ख कळणार का? धनंजय मुंडेंचा सवाल

परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मतद करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली.

By

Published : Nov 17, 2019, 6:07 PM IST

Updated : Nov 17, 2019, 7:38 PM IST

धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

मुंबई -परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये मतद करण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जोरदार टीका होत आहे. दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी दिली. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार असून, सरकारला या जन्मात तरी शेतकऱ्यांचे दुःख कळणार का? असा प्रश्न मुंडेंनी उपस्थित केला आहे.

परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान

परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक नष्ट झाले. अशातच मा. राज्यपाल महोदयांनी जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रशासनाने पिकांचे सरसकट पंचनामे करायला हवे. राज्यपालांनी कोणत्याही निकषाची अट न घालता, सरकारचे नेहमीचे धोरण बाजूला ठेवत शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी असे मत मुंडेंनी व्यक्त केले.

दिलेल्या तुटपुंज्या मदतीने पिकांवर झालेला खर्च सुद्धा वसूल करता येणार नाही. अस्मानी संकटाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार असल्याचे मुंडे म्हणाले. प्रशासनाने कर्जवसूलीस स्थगिती देऊन कर्जमाफी करावी. परीक्षा शुक्ल नव्हे तर संपूर्ण फी माफ करावी. विजेचे बिल माफ करावे तसेच रब्बीची उचल देण्यासाठी तरतूद करावी अशी आमची मागणी असल्याचेही मुंडे म्हणाले.

Last Updated : Nov 17, 2019, 7:38 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details