महाराष्ट्र

maharashtra

Deepak Kesarkar On Sanjay Raut संजय राऊतांनी आपली भविष्यवाणी सुधारावी, दीपक केसरकर यांनी काढला चिमटा

By

Published : Jan 10, 2023, 2:28 PM IST

ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. न्यायालयावर आमचा विश्वास आहे. लवकरच ठाकरे गटाला न्याय मिळेल असे भाकित संजय राऊत ( Deepak Kesarkar Criticize To Sanjay Raut ) यांनी केले होते. मात्र त्यांच्या या टीकेवर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत ( Sanjay Raut Predictions ) यांनी आपली भविष्यवाणी सुधारावी असे सांगत केसरकर यांनी राऊतांना चिमटा काढला आहे.

Deepak Kesarkar And Sanjay Raut
संजय राऊत आणि दीपक केसरकर

मुंबई -ठाकरे आणि शिंदे ( Thackeray vs Shinde ) गटाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court Hearing On Thackeray Faction ) 14 फेब्रुवारीपासून सलग सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले आहे. संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांनी शिंदे गटाला यावरून सूचक इशारा दिला. भाजप आणि शिंदे गटाचे सरकार आगामी काळात कोसळणार असल्याचे संजय राऊत ( Deepak Kesarkar Criticize To Sanjay Raut ) यांनी स्पष्ट केले. मात्र शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी आपली भविष्यवाणी ( Sanjay Raut Predictions ) सुधारावी, असा चिमटा दीपक केसरकर यांनी राऊतांना काढला आहे.

ठाकरे गटाने ठोठावले सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेराज्यातील सत्ता संघर्ष प्रकरणात 16 आमदारांना अपात्र करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून आजही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी 2023 ला होणार आहे. संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी यावरून शिंदे गटाला डिवचले आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी संजय राऊतांना खडेबोल सुनावले.

न्यायालयाचा मान राखला पाहिजेन्यायालयीन प्रक्रियेवर बोलणे सध्या उचित नाही. १४ पासून सुनावणी सुरू होणार आहे. मात्र, राऊत यांनी भविष्यवाणी सुधारावी, असा टोला केसरकर यांनी लगावला. तसेच न्यायालयाचा मान राखला गेला पाहिजे. त्यामुळे खोटे किती बोलले, तरी ते उघड होणार असल्याचेही केसरकर म्हणाले. जनतेने अशा नेत्यांवर किती विश्वास ठेवायचा, हे ठरवावे, असेही केसरकर म्हणाले.

बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा निरर्थकराज्यातील सत्ता संघर्षावर सध्या सुनावणी सुरू आहे. निकाल आमच्या बाजूने लागेल आणि आम्हाला न्याय मिळेल. काहींच्या मनात जूनपासून धडकी भरली आहे, असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray ) यांना लगावला. तसेच मोठ्या प्रमाणात ठाकरेंकडून आउटगोइंग सुरू असून लोकं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व ( Chief Minister Eknath Shinde ) स्वीकारत आहेत, असे उदय सामंत यांनी सांगितले. मंत्रिमंडळ विस्तारावर देखील त्यांनी भाष्य करताना कोणीही नाराज नाही. बच्चू कडूही नाराज असल्याची चर्चा निरर्थक असल्याचे ते यावेळी म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details