महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Corona Warrior Demand : आम्हाला भीक नको, आमचा अधिकार द्या : मुंबईतील कोरोना योद्ध्यांची मागणी

कोरोना या महाभयंकर आजाराने आता पुन्हा तोंड वर काढल्याने पुन्हा एकदा नागरिकांच्या जुन्या भयाण आठवणी ताज्या झाल्या आहेत. अशातच कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमध्ये जीवाची बाजी लावून लोकांचे प्राण वाचवणारे कोरोनायोद्धा आता पुन्हा सर्वांना आठवू लागले आहेत. परंतु, हेच कोरोनायोद्धा आजही सरकारकडून उपेक्षित राहिले आहेत. सरकारने दिलेले वचन अद्यापही ते पूर्ण करू शकले नसल्याने या कारोनायोद्धांचा भ्रमनिरास झाला आहे.

By

Published : Apr 3, 2023, 5:29 PM IST

Updated : Apr 3, 2023, 8:17 PM IST

Corona Warrior Demand
कोरोनायोद्ध्याची मागणी

मुंबईतील कोरोना योद्ध्यांची मागणी

मुंबई :कोरोना या आजाराच्या संसर्गाने 2019-20 साली संपूर्ण जग हादरून गेले होते. मुंबईमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात याचा प्रसार झाल्याने अनेकांना आपले जीव गमवावे लागले. लोकांना काहीच सुचत नव्हते, लोक घरामध्ये बंदिस्त झाली होती. परंतु, अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मदतीसाठी धावून आले ते कोरोनायोद्धा. मग ते डॉक्टर असतील, नर्सेस असतील, कंपाऊंडर असतील, पोलीस असतील किंवा समाजसेवक असतील. विविध प्रकारे या करोना योद्ध्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, दिवस-रात्र एक करून लोकांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, सरकारने अद्याप याची दखल घेतली नाही आहे. असाच एक अभिजीत जाधव हा कोरोनायोद्धा आजही सरकार दरबारी दुर्लक्षित आहेत.

लाज बाळगली नाही :अभिजीत जाधव हा मुंबईतील तरुण कोरोना येण्याच्या अगोदर एका ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर म्हणून हॉटेल बुकिंगचे काम करीत होता. २०१९ ला कोविड आला व १९ मार्च २०२० ला लॉकडाऊन लागले. यादरम्यान अभिजीतची नोकरी गेली. त्याने मासळी विकणे, भाजीपाला विकणे, मिळेल ती काम तो करीत गेला. घरे चालवण्यासाठी कुठल्याही पद्धतीची लाज बाळगली नाही. घर चालवण्यासाठी तो पडेल ते काम करीत राहिला. कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर अभिजीतने कर्ज काढून स्वतःच छोटसे गॅरेज सुरू केले. परंतु, १५ मार्च २०२१ ला पुन्हा लॉकडाऊन लागले. त्यामध्ये त्याला फार मोठा फटका बसला.

एनएसजी सेंटर येथे कामाला लागला :गॅरेजचे भाडे, कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला त्यांच्याकडे पैसे राहिले नाहीत. अशातच मुंबईमध्ये जी साऊथ, वरळी येथे कोविड योद्ध्यांसाठी भरती सुरू झाली. त्या प्रसंगी कोरोना उच्च स्तरावर होता. परंतु, अशा परिस्थितीत स्वतःच्या व घरच्यांच्या जीवाची पर्वा न करता मुंबई, वरळी येथील एनएसजी, सेंटर येथे अभिजीत कामाला लागला. आपण मरणाच्या दारातच काम करीत आहोत, असे त्याला वाटत होते. त्याने कधीच स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही.

आजपर्यंत अभिजितला एकही मोबदला नाही :कोरोना पेशंटबरोबर त्यांना राहायला लागायचे. एमआरआयसाठी कोरोना पेशंटला बाहेर घेऊन जाणे, बारा-बारा तास पीपीई किट घालून काम करणे, अशामध्ये २९ एप्रिल २०२१ला कोरोनायोद्धा म्हणून भरती झालेल्या अभिजीतने १० ऑगस्ट २०१९ पर्यंत काम केले. सुरुवातीला एनएससी वरळी येथे काम केल्यानंतर तिथले ऑक्सिजन प्लांट बंद झाल्याने नंतर त्यांना पोद्दार हॉस्पिटल वरळी येथे शिफ्ट करण्यात आले. परंतु, आजतागायत अभिजितला काही एक मोबदला भेटला नाही.

योद्धा म्हणून अनेक अडथळे :सरकारकडून कोरोनायोद्धासाठी दिवसाला ३०० रुपयांचा भत्ता दिला जाणार होता. परंतु, तोही अद्याप दिलेला नाही आहे. त्यादरम्यान कोरोनायोद्ध्यांची जेवणाची सोय नसायची. टॉयलेटची सुविधा नसायची. कोरोना पेशंटच टॉयलेट त्यांना वापरावे लागत होते. अशा परिस्थितीतून काम करून सुद्धा सरकारने अभिजीतसारख्या अनेक कोरोनायोद्ध्यांची दखल घेतली नसल्याचे अभिजीत सांगतो. त्या दरम्यान संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. रोजगार बंद झाले होते अशा परिस्थितीत पोट भरण्यासाठी हाताला काम मिळावे म्हणून कोरोनायोद्ध्यांसाठी अनेक तरुण-तरुणी, महिला, वृद्धांनीसुद्धा जीवाची बाजी लावत हे काम करण्यास पसंत केले. सरकारने या कामी दिवसाला तीनशे रुपये भत्ता दिला जाईल, असेही म्हटले होते. परंतु, आजपर्यंत यांना काहीच भेटले नाही आहे.

काळ गेला तसे आम्हालाही दुर्लक्षित केले गेले :राज्यात नाट्यमय सत्तांतर झाल्यानंतर १३ सप्टेंबर २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोविडयोद्धांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा केली. परंतु, त्यांना अजूनही कुठल्याही पद्धतीने काम दिले गेले नाही व त्यांचा भत्ताही दिला गेला नाही. यावर बोलताना अभिजीत म्हणतो की, जेव्हा आम्ही कोरोनायोद्धा म्हणून काम केले, तेव्हा आमच्यावर हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव करण्यात आला. मेणबत्ती पेटवल्या गेल्या, टाळ्या थाळ्या वाजवून आमचा सत्कार केला गेला. परंतु हे सर्व त्या काळापुरतेच होते.

नोकरीच्या आशेने आम्ही सरकारकडे पाहतोय :काळ गेला तसे आम्हालाही दुर्लक्षित केले गेले. फक्त नोकरीच्या आशेने आज आम्ही सरकारकडे पाहत आहोत. आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सरकार नोकरी भर्ती करणार आहे. त्यामध्ये आमचा समावेश केला जावा. कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेसुद्धा आम्ही काम करायला तयार आहोत. परंतु, आम्हाला वेंडर कोड दिला जावा. कारण जर कुणी मध्यस्थी करून आम्हाला कामावर ठेवण्यात आले, तर दलाल लोकच आमचा पगार खातील. म्हणून सरकारने आमच्यावर लक्ष द्यावे अशी अपेक्षा अभिजीत जाधवसारख्या असंख्य कोरोनायोद्धे व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा : Nawab Malik : दहशतवादी फंडिंग प्रकरणी नवाब मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ; 17 एप्रिलला पुढील सुनावणी

Last Updated : Apr 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details