महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

...अन्यथा सर्वसामान्यांसाठी होऊ शकतो लोकलचा दरवाजा बंद - मुंबई कोरोना रेल्वे न्यूज

मुंबईत कोरोना वाढत आहे. रेल्वेतही प्रवाशांची गर्दी होत आहे. नियमांना पायदळी तुडवले जात आहे. त्यामुळे लोकलमधील गर्दी नियंत्रणात नाही आली तर सर्वसामान्यांसाठी लोकलचे दरवाजे बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

mumbai
मुंबई

By

Published : Apr 4, 2021, 6:13 PM IST

Updated : Apr 4, 2021, 8:07 PM IST

मुंबई :कोरोनाची तीव्रता कमी होऊ लागल्याने 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना मर्यादित वेळेत लोकल प्रवासाला मुभा देण्यात आली. मात्र, आता मर्यादा पाळत नसल्याचे चित्र लोकल प्रवासात दिसून येत आहे. रेल्वे प्रशासनाची सुद्धा गर्दी नियंत्रण करताना दमछाक होत आहे. त्यामुळे मुंबईसह उपनगरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. लोकलमधील गर्दी नियंत्रणात आली नाही तर मुंबईच्या जीवनवाहिनीचे दार पुन्हा एकदा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद होण्याची शक्यात आहे.

लोकलमध्ये नियम पायदळी
मुंबईसह राज्यभरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारने खबरदारी म्हणून नाईट कर्फ्यू लावला आहे. कोरोना सबंधित नियमांचे लोकल प्रवासात पूर्णतः तीन तेरा वाजले आहेत. लोकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही. अनेक प्रवासी विनामास्क प्रवास करताना दिसून येत आहेत. शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेची मर्यादा घालून लोकलचे दार उघडले. मात्र, वेळेची मर्यादा प्रवाशांकडून पाळली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

वेळेचे बंधन पाळणे गरजेचे
शासनाकडून सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करण्याची अट घातली आहे. तसेच, या वेळेव्यतिरिक्त सर्वसामान्य प्रवाशांनी प्रवास केल्यास किंवा वेळेचं बंधन न पाळल्यास विना तिकीट प्रवास केल्याचा दंड आकारला जात होते. मात्र, हे वेळेचं बंधन पाळले जात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

माहिती देतांना प्रतिनिधी

प्रवाशांचे ओखपत्र तपासणे गरजचे
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी लोकल प्रवासात वेळेची मर्यादा घातली आहे. लोकलमधील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रवाशांचे ओळखपत्र तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनपूर्वी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गवरुन दररोज ७५ लाख प्रवासी प्रवास करत होते. यात ४० लाखांपेक्षा जास्त प्रवासी मध्य रेल्वेवरून प्रवास करतात. त्यामुळे मध्य रेल्वेने सध्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रवाशांचे ओखपत्र तपासणे गरजचे असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून व्यक्त केली जात आहे.

रेल्वे आणि राज्य सरकारमध्ये समन्वयाच्या अभावाचा आरोप
रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, 'कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकल ट्रेनमधील गर्दी नियंत्रित करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा लोकल बंद ठेवणे अडचणीचे ठरेल. आज रेल्वे आणि राज्य शासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे आज लोकलमधील प्रवासी वेळेचं बंधन पाळत नाहीत. आम्ही अनेकदा राज्य सरकार आणि रेल्वेला मागणी केली होती, की 15 डब्यांच्या लोकल गाड्या सुरू करा. खासगी कार्यालयाच्या वेळा बदला. मात्र, याची राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने दखल घेतली नाही'.

हेही वाचा -पुणे पोलिसांनी शेअर केला व्हिडिओ; मास्क न घालण्यासाठी आता काय द्याल कारण...!

हेही वाचा -'प्रत्येकवेळी राग आला, चीड आली म्हणून सरकारबाहेर पडणे योग्य नसते'

Last Updated : Apr 4, 2021, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details