महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधकांचा जाहीरनामा म्हणजे "जैश- ए- महमंद" चा जाहीरनामा- मुख्यमंत्री - election

विरोधकांनी बंद पडलेले इंजिन भाड्याने घेतल्याचा आरोप करत त्यांनी मनसेला गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. राज ठाकरे दररोज खोटे बोलत आहेत, असे ते म्हणाले.

विरोधकांचा जाहीरनामा म्हणजे "जैश- ए- महमंद" चा जाहीरनामा- मुख्यमंत्री

By

Published : Apr 25, 2019, 11:47 AM IST

मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिआक्रमक झाले आहेत. मोदींनी पाकीस्तानला ठणकाऊन उत्तर दिल्याचे सांगत अतिरेकी अड्डे उद्धवस्त केले. अमिरेका आणि इस्त्राईल नंतर भारत आता घुसुन मारणारा देश बनला आहे. बालाकोटमधे सोडलेल्या रॉकेटमधे विरोधकांना बसवून पाठवले पाहिजे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. ते बुधवारी उत्तर पूर्व लोकसभा (ईशान्य मुंबई) मतदारसंघात भाजपचे (महायुतीचे) उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ घाटकोपर (अमृत नगर) येथे विजय संकल्प सभेत बोलत होते.

विरोधकांचा जाहीरनामा म्हणजे "जैश- ए- महमंद" चा जाहीरनामा- मुख्यमंत्री

राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणतो पाकीस्तानशी चर्चा करा आणि काँग्रेस म्हणते कश्मीरातून लष्कर काढून टाकणार. देशद्रोहाचे कलम काढून टाकणारे महाखिचडी सरकार खोटे आहे. सशक्त भारतासाठी कमळाला मत द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आक्रमकपणे केले. आपले विरोधक शरद पवार बारावे खेळाडू आहेत. सामना सुरू होण्याआधी ते तंबूत गेलेत. आता त्यांचे चेले-चपाटे काय लढणार? विरोधकांनी बंद पडलेले इंजिन भाड्याने घेतल्याचा आरोप करत त्यांनी मनसेला गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते रोज खोटे बोलत आहेत. भारतीय सेनेवर प्रश्न विचारणारेच खोटे ठरले. हरीसालच्या गावात सभेच्या खोटी माहीती दिली. हरीसालच्या उपसरपंचाने राज ठाकरेंना खोटे ठरवले. आता आशिष शेलार उर्वरीत नमुने मार्केटमधे घेऊन येणार आहेत. ते मनसेला उघडे पाडतील, असेही ते म्हणाले.

काँग्रेसची आश्वासने उधारीची आहेत. त्यांचा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे. असे सांगत फडणवीस म्हणाले, राहुल गांधी काय खाऊन गरीबी हटवतील? ७२ हजार कुठून येणार? संधी दिली तेव्हा गरिबाला ७२ पैसे दिले नाहीत. भाजपच्या योजना लोकांपर्यंत पोहोचल्याचे सांगत विरोधकांना मोदींनी पुरते पछाडले आहे. विरोधकांच्या झोपा उडाल्या आहेत. विरोधकांची भाषणे काल्पनिक आणि विश्वास न ठेवण्यासारखी असल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली.

झोपडपट्टीवासियांना ५०० फुटांचे घर दिले तर मुंबईत जागा उरणार नाही. अर्धा समुद्र बुडवावा लागेल. सत्ता येणार नाही म्हणुन काँग्रेसवाले वाटेल ती आश्वासने देत सुटले आहेत. मालमत्ता कर माफीत हवी तर दुरुस्ती केली जाईल. मेट्रोचे जाळे मुंबईत उभे राहत आहेत. उपनगरी रेल्वेसाठी ६५ हजार कोटी दिले. रेल्वे स्टेशनचे रुपडे बदलले. देश सुरक्षित राहीला तर आपण सुरक्षित राहू. मुंबईत अतेरीकी हल्ला केला, काँग्रेसने फक्त निषेध केला. मोदींनी पाकीस्तानला ठणकाऊन उत्तर दिले. अतिरेकी अड्डे उद्धवस्त केले, असे ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details