मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडल्यानंतर चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिआक्रमक झाले आहेत. मोदींनी पाकीस्तानला ठणकाऊन उत्तर दिल्याचे सांगत अतिरेकी अड्डे उद्धवस्त केले. अमिरेका आणि इस्त्राईल नंतर भारत आता घुसुन मारणारा देश बनला आहे. बालाकोटमधे सोडलेल्या रॉकेटमधे विरोधकांना बसवून पाठवले पाहिजे, अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली. ते बुधवारी उत्तर पूर्व लोकसभा (ईशान्य मुंबई) मतदारसंघात भाजपचे (महायुतीचे) उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारार्थ घाटकोपर (अमृत नगर) येथे विजय संकल्प सभेत बोलत होते.
राष्ट्रवादीचा जाहीरनामा म्हणतो पाकीस्तानशी चर्चा करा आणि काँग्रेस म्हणते कश्मीरातून लष्कर काढून टाकणार. देशद्रोहाचे कलम काढून टाकणारे महाखिचडी सरकार खोटे आहे. सशक्त भारतासाठी कमळाला मत द्या, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी आक्रमकपणे केले. आपले विरोधक शरद पवार बारावे खेळाडू आहेत. सामना सुरू होण्याआधी ते तंबूत गेलेत. आता त्यांचे चेले-चपाटे काय लढणार? विरोधकांनी बंद पडलेले इंजिन भाड्याने घेतल्याचा आरोप करत त्यांनी मनसेला गांभिर्याने घेण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते रोज खोटे बोलत आहेत. भारतीय सेनेवर प्रश्न विचारणारेच खोटे ठरले. हरीसालच्या गावात सभेच्या खोटी माहीती दिली. हरीसालच्या उपसरपंचाने राज ठाकरेंना खोटे ठरवले. आता आशिष शेलार उर्वरीत नमुने मार्केटमधे घेऊन येणार आहेत. ते मनसेला उघडे पाडतील, असेही ते म्हणाले.