मुंबई :महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावरून ( Maharashtra Karnataka Border Dispute ) राजकारण तापले असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे दररोज नव- नवीन वादे करत आहेत. या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला आहे. जतच्या सीमावर्ती भागातील ४० गावावर दावा करणाऱ्या कर्नाटकने तुबची योजनेचे पाणी जत पूर्व भागात सोडले ( Karnataka released water from Tubchi scheme ) आहे. यामुळे तिकोंडी येथील साठवण तलाव एका दिवसात ओवरफ्लो झाला आहे. यामुळे शिंदे फडणवीस सरकारवर ( Shinde on Fadnavis Govt ) प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. जत तालुक्यातील दुष्काळी ( Drought in Jat Taluk ) गावांसाठी २ हजार कोटींचा निधी ( Shinde announces Rs 2 thousand crore ) जाहीर केला आहे.
जानेवारीमध्ये २ कोटींचे टेंडर काढणार?एकनाथ शिंदे म्हणाले की, कर्नाटकने महाराष्ट्राला डिवचत जत तालुक्यात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी जतमधील लोकांसोबत भेट झाली. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून जानेवारीमध्ये २ कोटींचे टेंडर काढत आहोत. सेवा, सुविधा मिळाली नाही म्हणून गावे बाहेर जाणार नाही ही राज्याची जबाबदारी आहे.
सरकार स्थापन केल्यानंतर चांगले निर्णय: या भागात कसे उद्योग निर्मिती करता येईल, याबत धोरण आखले जात आहे. अशा गावांचा आढावा घेण्याचे काम सुरु आहे. आमचा वैयक्तिक अजेंडा नाही. लोकांना चांगले दिवस आले पाहिजे. मी त्या सरकारमध्ये होतो. त्यात त्रुटी होते. आम्ही सरकार स्थापन केल्यानंतर चांगले निर्णय घेतले. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत जल सिंचन विभागाच एकतरी निर्णय घेतो. कारण बळीराजा आपला मायबाप आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटकात एंट्री नाही? : एमईएसच्या विनंतीवरून, महाराष्ट्राचे सीमा प्रभारी मंत्री 6 डिसेंबरला बेळगावला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ( Karnataka CM Basavaraj Bommai ) यांनी अप्रत्यक्षपणे कर्नाटक सरकारने त्यांच्यावर मनाई आदेश जारी करण्याचा निर्णय घेतल्याचे संकेत दिले आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील दोडामंगडी येथे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, राज्य सरकारच्या मुख्य सचिवांकडून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे संदेश पाठवण्यात आला आहे. दोन्ही राज्यांमधील तणावपूर्ण परिस्थिती बघता महाराष्ट्राच्या मंत्र्याने यावेळी येणे योग्य नाही.
6 डिसेंबर रोजी बेळगाव दौरा -महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनाकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला. उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील ( Higher Technical Education Minister Chandrakant Patil ) उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई ( Excise Minister Shambhuraj Desai ) या दोघांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली असून हे दोन्ही मंत्री ३ डिसेंबरला बेळगावला भेट देणार होते. परंतु आता ही भेट ३ डिसेंबर एवजी ६ डिसेंबर रोजी होणार असल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे.