महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुशांतसिंह मृत्यू प्रकरण: 'सीबीआय पथकाला पुन्हा क्वारंटाईनमधून सूट मागण्याची गरज नाही' - mumbai mnc on cbi officers

सीबीआय पथकास क्वारंटाईनमधून आधीच सूट देण्यात आली आहे. त्यांना सूट मिळण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले.

सुशांत मृत्यू प्रकरण
सुशांत मृत्यू प्रकरण

By

Published : Aug 31, 2020, 9:25 PM IST

मुंबई- अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडून केली जात आहे. सीबीआय अधिकारी गेले ११ दिवस सतत याप्रकरणी चौकशी करत आहेत. त्यामुळे ते आता पुन्हा परत जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सीबीआय अधिकाऱ्यांनी क्वारंटाईनमधून सवलत मिळण्यासाठी रितसर मागणी केली होती. त्यांना तशी सवलत देण्यात आली आहे. त्यांना पुन्हा सवलत मागण्याची गरज नसल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिली. यामुळे यापुढेही सीबीआय पथक मुंबईत राहून चौकशी करू शकते हे स्पष्ट झाले आहे.

अभिनेता सुशांत सिंहचा १४ जूनला मुंबईत त्यांच्या राहत्या घरात मृत्यू झाला होता. ही हत्या होती की आत्महत्या याचा तपास बिहार पोलिसांकडून केला जात होता. या प्रकरणी चौकशीसाठी आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना पालिकेने क्वारंटाईन केले होते. त्यानंतर नियमानुसार त्यांना ७ दिवसात पुन्हा बिहारला परत जावे लागले होते. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या चौकशीसाठी दिल्लीतील सीबीआय पथक २१ ऑगस्टला मुंबईत दाखल झाले. मुंबईत येण्याआधी सीबीआय पथकाने मुंबई महापालिका प्रशासनाकडे क्वारंटाईनमधून सूट मिळावी, यासाठी रितसर अर्ज केला होता. सीबीआय पथकाला मुंबईत राहून ४ सप्टेंबरला १४ दिवस पूर्ण होणार आहेत. यामुळे ते पुन्हा पालिकेकडे क्वारंटाईनमधून सूट मिळण्यासाठी अर्ज करतील, अशी चर्चा होती. परंतु, सीबीआय पथकास क्वारंटाईनमधून आधीच सूट देण्यात आली आहे. त्यांना सूट मिळण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी सांगितले.

हेही वाचा-नऊ मिलीमीटर बाप्पाची मूर्ती विराजमान, पाहा आहे कोठे

ABOUT THE AUTHOR

...view details