महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑक्सिजनसाठी केंद्राने राज्याला दिलेला निधी कुठे गेला? भाजप आमदाराची चौकशीची मागणी - Oxygen Generation Project Prasad Lad comment Mahavikas aghadi

महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र, आघाडी सरकारने या निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता, असा सणसणीत टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

PM Care Fund Prasad Lad Question
ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प प्रसाद लाड महाविकास आघाडी टीका

By

Published : Apr 25, 2021, 5:20 PM IST

मुंबई - महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र, आघाडी सरकारने या निधीचा विनियोग योग्य प्रकारे केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता, असा सणसणीत टोला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

माहिती देताना भाजप आमदार प्रसाद लाड

हेही वाचा -मुंबई : पवनधाम कोविड सेंटर उद्यापासून सुरू होणार; पालकमंत्री अस्लम शेख यांची माहिती

केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले? याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. आज पत्रकार परिषदेत बोलताना, कोरोनाच्या महामारीच्या काळात कोणत्याही राज्याला अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजनची कमतरता भासू नये. प्रत्येक राज्य या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2020 मध्ये राज्य सरकारांना पत्रे पाठवली होती. त्यानुसार पीएम केअर निधीतून महाराष्ट्राला दहा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी निधी देण्यात आला. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांत या निधीचा वापर करून राज्य सरकारने एकही प्रकल्प सुरू केला नाही. गेल्या काही दिवसांत ऑक्सिजन अभावी अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. केंद्राने दिलेला अर्थसहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले असते. एका पोलीस अधिकाऱ्याकडून वसुली करणाऱ्या या सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेला निधी खाऊन टाकला, अशी घणाघाती टीका प्रसाद लाड यांनी केली.

अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठी काही केले नाही - लाड

घरात बसलेल्या सरकारने कोरोनाची दुसरी लाट भयावह असणार आहे, याची कल्पना असूनही या काळात अत्यावश्यक असलेल्या सुविधांच्या निर्मितीसाठी काहीही केलेले नाही. या नाकर्त्या सरकारमुळेच आज राज्यातल्या सामान्य जनतेचा बळी जात आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या मागणीनुसार दहा दिवसांत ४ लाख 35 हजार रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आत्तापर्यंत राज्याला 1 लाख 65 हजार रेमेडेसिवीर औषधे मिळाली आहेत. तसेच, राज्य सरकारनेही विविध यंत्रणांच्या माध्यमातून पाच लाख औषधांची खरेदी केलेली आहे, तरीही सध्या राज्यात औषधांचा तुटवडा आहे? हे औषध कुठे गायब झाली? या औषधांचा काळाबाजार झाला का? राज्य सरकारने या सर्व औषधांचा हिशेब द्यावा व जनतेच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी, अशी प्रतिक्रिया लाड यांनी दिली.

हेही वाचा -मुंबई : रुग्णांच्या मदतीला धावला 'ऑक्सिजन मॅन'; ५ हजार रुग्णांना पोहोचवली मदत

ABOUT THE AUTHOR

...view details