महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 29, 2021, 8:32 PM IST

ETV Bharat / state

'क्या हुवा तेरा वादा' म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर टीका

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. त्यांनी व्हिडिओ ट्वीट करत 'यवतमाळमधील दारुबंदीच काय झाल? क्या हुआ तेरा वादा, जयंतरावजी', असा खोचक प्रश्न विचारला आहे.

bjp leader chitra wagh critisize jayant patil on liquor ban
'क्या हुवा तेरा वादा' म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांची जयंत पाटलांवर टीका

मुंबई - महाविकास आघाडी सरकारने चंद्रपूरमधील दारूबंदी उठवून संपूर्ण विरोधकांना अंगावर घेतले आहे. त्यातच आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. त्यांनी व्हिडिओ ट्विट करत 'यवतमाळमधील दारुबंदीच काय झाल? क्या हुआ तेरा वादा, जयंतरावजी', असा खोचक प्रश्न मंत्री जयंत पाटील यांना विचारला आहे.

प्रतिक्रिया

आश्वासनाचे काय झाले -

चित्रा वाघ यांनी ट्वीट करून जयंत पाटील यांना त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिली. सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले होते. मात्र, या सरकारने यवतमाळमध्ये दारूबंदी न करता चंद्रपूरची दारुबंदी उठवली. त्यामुळे महिलांना कमी समजू नका, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही वाचा - अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये विनाशुल्क प्रवेशासाठी कुटूंबाची उत्पन्न मर्यादा आठ लाखांवर

ABOUT THE AUTHOR

...view details