मुंबई - काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधीवर टीका होताना दिसत आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली आहे. राहुलबाबा, एकार्थाने बरंच झाले तुमचं आडनाव सावरकर नाही...नाहीतर सावरकर यांच्याबद्दल वापरलेले तेज, त्याग हे सगळे शब्द बदनाम झाले असते, असे म्हणत शेलार यांनी गांधींना लक्ष्य केले आहे.
'बरं झालं राहुल गांधींचं आडनाव सावरकर नाही' - shelar speech in savrkar
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नेत्यांकडून राहुल गांधीवर टीका होताना दिसत आहे. भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनीही राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका केली
!['बरं झालं राहुल गांधींचं आडनाव सावरकर नाही' Bjp leader Aashish shelar critisim on Rahul gandhi](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5377899-thumbnail-3x2-oaoao.jpg)
आशिष शेलार यांची राहुल गांधींच्या वक्तव्यावर टीका
बलात्काराच्या वक्तव्यावरून माफी मागणार नाही. माझे नाव राहुल गांधी आहे, राहुल सावरकर नाही, असे राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. यानंतर राजकीय वर्तुळातून राहुल गांधी यांच्यावर टीका होऊ लागली. राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी भाजपने केली आहे. आशिष शेलार यांनी ट्वीट करत राहुल गांधींवर टीका केली.