महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप देशात मुस्लीमविरोधी वातावरण तयार करत आहे' - मुस्लिम विरोधी वातावरण मुस्लिम विरोधी वातावरण

आंबेडकर यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध केला आहे. हा घटनेचा द्रोह असून, अर्थव्यवस्थेसारखे मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लीम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशात जी नऊ रत्ने आहेत ती विकण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

ambedkar
वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर

By

Published : Dec 9, 2019, 7:25 PM IST

Updated : Dec 9, 2019, 8:07 PM IST

मुंबई - भाजपचे सरकार देशात मुस्लीमविरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. आज गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचा प्रस्ताव लोकसभेत मांडल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रकाश आंबेडकर

आंबेडकर यांनी या विधेयकाला विरोध केला आहे. हा घटनेचा द्रोह असून, अर्थव्यवस्थेसारखे मुद्दे बाजूला पडावे म्हणून हिंदू-मुस्लीम वातावरण तयार करण्याची ही भाजप आणि आरएसएसची खेळी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या देशात जी नऊ रत्ने आहेत ती विकण्यासाठी हे सरकार प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

हेही वाचा -सरकारने हिंदू-मुस्लिम फाळणी केली आहे; शिवसेनेचा अग्रलेखातून भाजपवर निशाणा

आंबेडकर म्हणाले, 'हे सरकार संविधानाचा ढाचा उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत आहे. आज देशापुढे ढासळती अर्थव्यवस्था आणि बेरोजगारीसारख्या गंभीर समस्या आहेत. त्यातून मार्ग काढण्यात हे सरकार अपयशी ठरत आहे. त्यामुळे लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी देशामध्ये मुस्लीम विरुद्ध इतर असे समीकरण करून धार्मिक भांडणे लावण्याचा सरकारचा हेतू आहे'

Last Updated : Dec 9, 2019, 8:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details