मुंबई -विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. त्यामुळे आता ग्रामपंचायतीच्या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाचा केविलवाणा प्रयत्न सुरू असल्याचा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे. कोकणासह राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींमध्ये भाजपकडून जिंकण्याचा दावा केला जात असून त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
निवडूण येणारा, मी तुमचाच आहे म्हणतो -
मी मागील तीस वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलेलो आहे. आमच्याकडे सुद्धा 2 गट निवडणुकीसाठी उभे राहतात आणि त्यातील जो निवडून येतो, तो मी तुमचाच आहे, असे म्हणतो. आम्ही सुद्धा त्यांना जवळ घेऊन त्यांचे स्वागत करतो. मात्र, या निवडणुकीत उभे राहणारे कोणत्याही पक्षाच्या निवडणूक चिन्हावर नसतात. त्यामुळे उमेदवार पक्षाचा आहे, असे म्हणता येत नाही. मात्र, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका किंवा राज्यातील मोठे साखर कारखान्यांचे पॅनल येथे मात्र या निवडून आलेले लोक पक्षाचे असतात. हे पण त्या निवडणुकीच्या दरम्यान कळते, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे.