मुंबई : निरव मोदी आरोपी असलेल्या पीएनबीच्या दहा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यामध्ये निरव मोदी आणि इतर नातेवाईक आरोपी पळून गेल्यामुळे सीबीआयने त्यावेळेला धाडसत्र सुरू केले. याप्रकरणी कविता मानकेकर यांना अटक करण्यात आली आहे. बँकर्सने पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट येथील ब्रांडी हाऊस या शाखेत बनावट लेटर वापरले आणि एका वर्षाच्या काळासाठी मोत्यांच्या आयातीसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेमध्ये बनावट लेटरचा वापर केला. त्यानंतर दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे. मात्र कविता मानकेकर यांना अटक केली ती, 20 फेब्रुवारी 2018 रोजी. त्यावेळेला रात्री आठ वाजले होते. आणि आठ वाजेच्या सुमारास महिलेला पुरुष पोलिसांनी अटक करणे हे फौजदारी प्रक्रिया संहिता यातील कलम 46 याचे उल्लंघन होते.
या कारणाने जामीन मिळाला :कायद्याप्रमाणे कोणत्याही महिलेला रात्री पुरुष पोलीस आठ वाजता अटक करू शकत नाही. त्याचे कारण सूर्यास्तानंतर आणि सूर्योदयापूर्वी महिलांना या संदर्भात अटक केली जाणार नाही हा नियम आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याच घटनेच्या संदर्भातील याचिकेत मे 2018 मध्ये आदेश दिला होता आणि सीबीआय अधिकाऱ्यांवर महिलेला रात्री पुरुष पोलिसांनी अटक केली. ते कायद्याचे उल्लंघन होते म्हणून पोलिसांना 50 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला होता आणि तिला जामीन मंजूर केला होता.
कविता मानकेकर यांच्यावरील आरोप काय?दहा हजार कोटी रुपयांचा पीएनबी घोटाळा झाला त्यामध्ये ज्वलन मोदी आणि त्याचे इतर नातेवाईक देखील आरोपी आहेत आणि या घोटाळ्यामध्ये तीन आरोपी कंपन्यांचे कार्यकारी सहाय्यक म्हणून कविता मानकिकर यांनी स्वाक्षरी केली होती. ती अधिकृत स्वाक्षरी होती ज्यामध्ये लेटर ऑफ अंडरटेकिंग या बनावट पत्रावर स्वाक्षरी केली होती. त्या स्वाक्षरीमुळे कविता मानकीकर या अडचणीत आल्या आहेत. कारण या पत्राच्या आधारेच निरव मोदीच्या कंपन्यांनी प्रचंड इतक्या रकमेचे कर्ज घेतले होते. आणि या यांच्या बनावट पत्रावरील स्वाक्षरी मुळे निरोप मोदी यांना हे कर्ज मिळाले होते त्यामुळे त्यांच्यावर त्यासंबंधीचा आरोप आहे.