महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Azad Maidan Khau Galli : हजारो लोकांचे पोट भरणारी आझाद मैदान येथील खाऊ गल्ली - आझान मैदान खाऊ गल्ली विशेष बातमी ईटीव्ही भारत

मुंबईत देशभरातून लाखो लोक आपले पोट भरण्यासाठी येतात. त्यापैकी अनेकांचे हातावर पोट असते. आझाद मैदानात ( Azad Maidan Mumbai ) आंदोलने सुरू असतात. अशा सर्वांचे पोट भरण्याचे काम आझाद मैदान येथील खाऊ गल्ली करते. ( Khau Galli Azad Maidan )

Azad Maidan Khau Galli ETV Bharat Special Report
हजारो लोकांचे पोट भरणारी आझाद मैदान येथील खाऊ गल्ली

By

Published : Jan 26, 2022, 3:53 PM IST

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ( Finance Capital of India Mumbai ) ओळख आहे. मुंबईत देशभरातून लाखो लोक आपले पोट भरण्यासाठी येतात. त्यापैकी अनेकांचे हातावर पोट असते. आझाद मैदानात ( Azad Maidan Mumbai ) आंदोलने सुरू असतात. अशा सर्वांचे पोट भरण्याचे काम आझाद मैदान येथील खाऊ गल्ली करते. ( Khau Galli Azad Maidan ) या ठिकाणी स्वस्त आणि मस्त खाण्याची सोय असल्याने हजारो लोकांसाठी ही खाऊ गल्ली जेवणाचा आधार बनली आहे.

ईटीव्ही भारत प्रतिनिधी अजेयकुमार जाधव यांनी घेतलेला आढावा

अशी बनली खाऊ गल्ली -

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिका मुख्यालयाला लागून आझाद मैदानाच्या गेट जवळ खाऊ गल्ली आहे. ही खाऊ गल्ली बनण्या आधी २० वर्षांपूर्वी राज्य सरकारचे झुणका भाकर केंद्र होते. ५० पैशात एक भाकरी आणि झुणका दिला जायचा. या झुणका भाकरचा आस्वाद घ्यायला लांबून लोक यायची. दुपारी जेवण्याच्या वेळेला या केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायची. काही वर्षाने हे झुणका भाकर केंद्र बंद पडले. त्यानंतर बाजूलाचा कॅनॉनचे पावभाजी केंद्र सुरू झाले. त्याला लागून असलेल्या दुकानामध्ये खाण्याच्या पदार्थ विकले जाऊ लागले. यामुळे गेल्या काही वर्षांत ही गल्ली खाऊ गल्ली म्हणून प्रसिद्ध झाली.

स्वस्त आणि मस्त पदार्थ -

या खाऊ गल्लीत वडा पाव, समोसा, भजी, सँडविच, डोसा, चायनीज, अंडा बुर्जी पाव, सरबत, पाव भाजी असे पदार्थ विकणारे १० ते १३ विक्रेते आहेत. येथे १२ रुपयांत वडापाव पासून ४० ते ७० रुपयांत चायनीज मिळते. यामुळे स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थ मिळत असल्याने या ठिकाणी गर्दी असते. विशेष करून दुपारी जेवणाच्या वेळेस खवय्यांची मोठी गर्दी असते. या ठिकाणी असलेल्या सरबत विक्रेत्याकडे लिंबू सरबत, कालाखट्टा, कलिंगडचे सरबत पिण्यासाठी विशेष करून लोकांची गर्दी असते.

हेही वाचा -Anil Parab on ST Issue : एसटी विलिनीकरणाचा मुद्दा आमच्या हातात नाही - परिवहन अनिल परब

यांना होतो खाऊ गल्लीचा फायदा -

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात लाखो लोक कामानिमित्त येतात. हजारो पर्यटकही या विभागातील ऐतिहासिक इमारती, गेट वे योग्य ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह परिसरात येतात. आझाद मैदानात वर्षभर कोणते ना कोणते आंदोलन सुरू असते. पोलिसांचाही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त असतो. कामानिमित्त आलेले लोक, पर्यटक, आंदोलनकर्ते आणि पोलीस त्याचसोबत महापालिका कर्मचारीही खाऊ गल्लीतील पदार्थांचा आस्वाद घेतात.

ABOUT THE AUTHOR

...view details