महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नवाब मलिकांनी पुरावे द्यावे अन्यथा राजीनामा द्यावा - अतुल भातखळकर - मुंबई जिल्हा बातमी

महाराष्ट्रात रेमडेसीवीर देण्याला केंद्राने बंदी घातली आहे, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात पुरावे द्यावेत, अन्यथा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार तथा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

भातखळकर
भातखळकर

By

Published : Apr 17, 2021, 7:39 PM IST

Updated : Apr 17, 2021, 7:51 PM IST

मुंबई- महाराष्ट्रात रेमडेसीवीर देण्याला केंद्राने बंदी घातली आहे, असा खळबळजनक आरोप करणाऱ्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात पुरावे द्यावेत, अन्यथा मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे आमदार तथा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

बोलताना अतुल भातखळकर

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली आहे. यामुळे भारतातील 16 निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या 20 लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाही. केंद्र सरकार कुपी विकण्याला नकार देत असल्याचा खळबळजनक आरोप मलिक यांनी केला आहे. राज्यसरकारने 16 निर्यातदार कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता, केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिला तर आमचा परवाना रद्द करण्याची धमकी दिली असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे, असे नवाब मलिक यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

मंत्री मलिक यांच्या आरोपावरुन राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून भाजपने मलिक यांच्या आरोपनंतर सरकारच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. राज्यात एकीकडे परिस्तिथी हाताबाहेर जात आहे. अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत. तसेच ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाची स्तिथी नियंत्रणात आणण्यात सरकारला अपयश येत असल्यानेच आता केंद्रावर आरोप केले जात असल्याचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -केंद्र सरकारचा महाराष्ट्राबरोबर दुजाभाव; नवाब मालिकांचा पुराव्यानिशी आरोप

हेही वाचा -महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

Last Updated : Apr 17, 2021, 7:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details