मुंबई: अॅड. आशिष शेलार हे उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हणाले की, मुंबईत आलेले उद्योग ते पळवून लावायचे. (Mumbai BJP President) मुंबईत बुलेट ट्रेन, मेट्रो, मेट्रो कारशेड, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, नवे विमानतळ, जैतापूर प्रकल्प, वाढवण बंदर प्रत्येक प्रकल्पाला विरोध उबाठाने केला. (MLA Adv Ashish Shelar) हे विकासाच्या वाटेतील गतिरोधक झाले आहेत. (Uddhav Thackeray) कालच्या भाषणात जाहीरपणे त्यांनी ही बाब बोलून दाखवली, असा टोला आमदार अॅड आशिष शेलार यांनी लगावला. (Ashish Shelar)
उद्धव ठाकरेंच्या 1 हजार पेक्षा जास्त घोषणा:"मी करणार म्हणजे करणारच....!" आरक्षण देणार म्हणजे देणारच...! शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणारच...! शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार म्हणजे करणारच..! महापालिकेवर भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच...! उद्धव ठाकरेंनी गेल्या 10 वर्षांत अशा 1 हजार 531 घोषणा केल्या. आमच्या बॅक ऑफिसने कालच यांची मागची दहा वर्षांतील भाषणे काढली. त्यामध्ये आश्चर्यकारक ही माहिती समोर आली. त्या घोषणांचं पुढे काय झालं? त्यामुळे यांच्या शब्दाला किंमतच नाही. उध्दव ठाकरे म्हणजे "पोकळ शब्दांचे खोडकळ नेते" आहेत, अशा शब्दांत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी पलटवार केला. पंतप्रधानांच्या कुटुंबाचा विषय तुम्हीच काढलाय तर मग तुम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. उद्धव ठाकरे हे सख्ख्या भावा विरोधात न्यायालयात लढले की नाही? त्यांचे त्यांच्या वहिनी सोबत कौटुंबिक नाते आहे, की भांडण? असे आशिष शेलार म्हणाले.