महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अर्णब गोस्वामी यांना उद्या विधानभवनात नोंदवावी लागणार साक्ष - Arnab Goswami Witness Registration

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. आता या नोटीस संदर्भात अर्णब गोस्वामी यांना उद्या सायंकाळी पाच वाजता विधान भवनात हजर राहून साक्ष नोंदवावी लागणार आहे.

Vidhan Bhavan
विधानभवन

By

Published : Mar 2, 2021, 10:41 PM IST

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल अर्वाच्च भाषा वापरल्याने संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवण्यात आली होती. आता या नोटीस संदर्भात अर्णब गोस्वामी यांना उद्या सायंकाळी पाच वाजता विधान भवनात हजर राहून साक्ष नोंदवावी लागणार आहे. तर, आमदार प्रताप सरनाईक यांची देखील साक्ष या प्रकरणात नोंदवली जाईल.

हेही वाचा -बाळासाहेब ठाकरे योजनाही सरकारला राबवता आली नाही; दरेकरांची सरकारवर टीका

उद्या अर्णब गोस्वामी हक्कभंगाच्या कारवाईसाठी उपस्थित राहणार का, याकडे देखील सगळ्यांचे लक्ष असणार आहे. निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना आपले काम व्यवस्थित करता यावे म्हणून काही विशेष अधिकार दिले जातात. काम करताना आमदार किंवा खासदार यांचा कोणी अपमान केला, तर त्याच्या विरोधात हक्कभंग केला जाऊ शकतो.

काय आहे हे प्रकरण?

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात वार्तांकन करताना संपादक अर्णब गोस्वामी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी शब्दात उल्लेख केला होता. तसेच, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची देखील अर्वाच्च भाषेत सूत्रसंचालन करत आव्हान देणारी भाषा वापरली होती. त्यामुळे, राज्य सरकारवर, तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांवर अर्वाच्च भाषा वापरल्या कारणाने आमदार प्रताप सरनाईक यांनी संपादक अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

हेही वाचा -‘कोस्टल रोड’ बोगद्याचे १०० मीटर खोदकाम पूर्ण

ABOUT THE AUTHOR

...view details