महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 20, 2020, 10:37 AM IST

ETV Bharat / state

पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

anil deshmukh Said attempt police officers tried overthrow maha vikas Aghadi government
पोलिस अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; गृहमंत्री अनिल देशमुखांचा खळबळजनक दावा

मुंबई -काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली आहे.

सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण-कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल गृहमंत्री देशमुख यांना मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर गृहमंत्री म्हणाले, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की, त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न केले. त्यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहेत अशी विधाने करणे, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वत: राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी यात हस्तक्षेप केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली आणि हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आले, असे गृहमंत्र्यांनी या मुलाखतीमध्ये सांगितले. एकंदरीतच गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा राजकीय धुळवड सुरू होणार असून अप्रत्यक्षपणे भाजपाचाही या पाडापाडीच्या राजकारणात सहभाग आहे का? यावरही चर्चा घडून येणार आहे.

हेही वाचा -मुंबई कोरोना अपडेट : शनिवारी तब्बल 5 हजार 105 रुग्णांची कोरोनावर मात, नविन 2 हजार 211 रुग्णांची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details