महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anganwadi Workers March : अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार ; शासकीय दर्जा आणि रिक्त पदे भरण्यासाठी 20 सप्टेंबरला आझाद मैदानावर मोर्चा - अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा

अंगणवाडी कर्मचारी हे कुठल्याही तात्पुरता योजनेचा भाग नाही. तर हे शासनाने कायद्याने निर्माण केलेली पदे आहेत. त्यामुळे या सर्व लाखो कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी. रिक्त पदे त्वरित भरावी, या मागणीसाठी राज्यभर अंगणवाडी संघटनेच्या वतीने मोर्चे सुरू ( Anganwadi workers march ) आहे. याचा एक भाग म्हणून 20 सप्टेंबर 2022 रोजी आझाद मैनावर लाखोंचा मोर्चा धडकणार ( Anganwadi workers march to Azad Maidan ) आहे.

Anganwadi workers march
अंगणवाडी सेविकांचा मोर्चा

By

Published : Sep 14, 2022, 2:13 PM IST

मुंबईराज्यात लाखो मुले अंगणवाडीमध्ये अनौपचारिक शिक्षण आणि पोषण आहार घेतात. त्यासोबत स्तनदा माता, गरोदर महिला यांनादेखील अंगणवाडीकडून विविध सेवा दिल्या जातात. अंगणवाडी कर्मचारी हे कुठल्याही तात्पुरता योजनेचा भाग नाही. तर हे शासनाने कायद्याने निर्माण केलेली पदे आहेत. त्यामुळे या सर्व लाखो कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी. रिक्त पदे त्वरित भरावी, या मागणीसाठी राज्यभर अंगणवाडी संघटनेच्या वतीने मोर्चे सुरू (Anganwadi workers march on 20 September against demand filled vacant posts immediately ) आहे. याचा एक भाग म्हणून 20 सप्टेंबर 2022 रोजी आझाद मैनावर लाखोंचा मोर्चा धडकणार ( Anganwadi workers march on 20 September ) आहे.


राज्यात हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त -महाराष्ट्र राज्यात एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजना अंतर्गत 97,475 अंगणवाडी सेविका 97475 मदतनीस व 13 011 मिनी अंगणवाडी सेविका पदे निर्माण केली आहे. राज्यामध्ये आजही ग्रामीण आदिवासी व शहरी भागात 19 हजाराचे 845 पदे रिक्त असल्याने लाभार्थ्यांना या योजनेचे फायदे मिळत नाही. त्यामुळे बालमृत्यू आणि कुपोषण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं त्यांचं म्हणणं ( march demand vacant posts filled immediately ) आहे.



अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कल्याणकारी लाभ मिळावे -राज्यामध्ये सेवानिवृत्त झालेले 6500 कर्मचारी, मृत्यू पावलेले 1650 कर्मचारी यांना सेवा समितीच्या लाभाची रक्कम मिळाली नाहीये. त्यांच्या वारसांना सेवेमध्ये अद्यापही घेतलेले नाहीये. म्हातारपणी त्यांची उपासमार होते. सेवानिवृत्तीनंतर मिळणारे लाभ हे तातडीने दुसऱ्या दिवसापासून मिळाला हवे. अशा अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्यभर आंदोलन सुरू केलं आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन होत आहे. याचा समारोप 20 सप्टेंबर रोजी आझाद मैदानात होणार आहे.


अंगणवाडी संघटना भूमिका -यासंदर्भात, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ नेते एम. ए. पाटील यांच्याशी ईटीव्हीने संवाद साधला असता त्यांनी सांगितले की, वीस आणि तीस वर्षे सेवा झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवा जेष्ठतेनुसार शासन आदेशानुसार त्या रीतीने मानधन वाढ फरकासह दिली जावी. शासकीय वेतनश्रेणी सुद्धा मिळावी. तसेच अनेक कल्याणकारी मागण्या शासनाने अद्याप मान्य केलेला नाही. त्यामुळे शासनासमोर गाऱ्हाणे मांडण्यासाठी आम्ही वीस तारखेला राज्यव्यापी मोर्चा आझाद मैदानामध्ये आयोजित केला असल्याचे सांगितले. ( Anganwadi workers march )

ABOUT THE AUTHOR

...view details