मुंबई: पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अश्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने पंचनामे करुन तो अहवाल शासनाकडे सादर करावा अशी मागणी होत आहे. तसेच 2023 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या भागात आजही लोकसभेत गोंधळ झाला आहे. राज्यात विशेषतः मराठवाड्यात गेल्या सात दिवसांपासून अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कर्मचाऱ्यांना एकाच मापात तोलू नये: शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीवरील शेत पिकांचे नुकसान झाले असतानाही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत. त्यातच गेल्या सात दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. अशा वेळेस सरकारने समजूतदारपणे काम करण्याची आवश्यकता असताना संजय गायकवाड हे आमदार अत्यंत संवेदनशील वक्तव्य करतात. सरकारी कर्मचारी 75 टक्के हरामाची कमाई खातात हे अत्यंत निंदनीय वक्तव्य असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना एकाच मापात तोलू नये, असे पवार यावेळी म्हणाले आहेत.