मुंबई- खड्डेमुक्त, कचरामुक्त तसेच रोगराईमुक्त वरळी या त्रिसूत्रीनुसार वरळीचा विकास करण्यासाठी पालिका आयुक्तांची भेट घेतल्याची माहिती शिवसेना युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली. यावेळी वरळीमध्ये राबवण्यात येणारी रोगराईमुक्त वरळी ही संकल्पना मुंबईमधील सर्व विभागात रावबावली जावी, यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे नुकत्याच झालेल्या वरळी विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. आमदार म्हणून निवडून आल्यावर आदित्य ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह नवनिर्वाचित महापौरांचे अभिनंदन करण्यासाठी आले होते. त्यानंतर आमदार म्हणून त्यांनी पहिल्यांदाच पालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांची भेट घेतली.
हेही वाचा -एकनाथ खडसे पंकजा मुंडेंच्या भेटीला, भाजपमध्ये नाराजी सत्र सुरूच