मुंबई - भाजपचे सोशल मीडिया प्रमुख मनोज कटके यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे ( Attack on BJP partyworker in Dombivali ) मारेकरी अद्याप मोकाट असल्याचा आरोप आमदार रविंद्र चव्हाण ( MLA Ravindra Chavan ) यांनी केला. कल्याण-डोंबिवली विभागात सरकारची दपडशाही सुरू असल्याचे ते म्हणाले.
आघाडी सरकारचा भोंगळ कारभार -
कल्याण डोंबिवली भागात भाजपच्या सोशल मीडिया प्रमुख मनोज कटके यांच्यावर काही समाजकंटकांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून हल्ला केला. कटके यात गंभीर झाले आहेत. आज या घटनेला पंधरा दिवस उलटून गेले. स्थानिक पोलीस ठाण्यात वारंवार तक्रार केली. मात्र, साधी पोलिसांकडून दखल घेण्यात आलेली नाही. राजकीय सूडभावनेतून हा हल्ला झाला आहे. गँगस्टरकडून त्रास देण्यात येतो आहे. सरकारची ही दडपशाही आहे. या विरोधात पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले. मात्र, पोलिसांनी दरवाजा बंद घेत आहेत, असा आरोप चव्हाण यांनी केला. आघाडी सरकारचा भोंगळ कारभार सुरू असून याला आळा बसायला हवा, असे चव्हाण म्हणाले.