2:27 नंदुरबार -जिल्ह्यात काल संध्याकाळपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे....जिल्ह्यातील धरणे ओवरफ्लो... दुर्गम भागातील खेडे गावांना जोडणारा फरशी पूल पुरामुळे वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे... नाल्यांनाही महापूर 2.19 रायगड - कोकण रेल्वे रुळावर पेण येथे दरड कोसळली, दोन तासांनी दरड काढल्यानंतर कोकण रेल्वे वाहतूक सुरू
2.15 मुंबई - पोटातून कोकेनच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या एकाला मुंबई विमानतळावर अटक
कोकेनने भरलेल्या 60 कॅप्सूल पोटातून काढल्या.. एअर इंटेलिजन्स पथकाची कारवाई.. वेणूझुआलाच्या 26 वर्षीय आरोपीला नागरिकाला अटक... जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 2 कोटी 20 लाख रुपये... आरोपी तरुणाला 6 दिवस रुग्णालयात ठेवण्यात आले होते. या 6 दिवसात त्याच्या पोटातून कोकेनच्या 60 कॅप्सूल सापडल्या आहेत...ब्राझीलमधून कोकेन ड्रग मुंबईत आणल्याची माहिती...
1:13 सांगली -कोयना धरणाचे सहा दरवाजे 11 फुटांनी उघडले.... कोयना नदीत 41 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे...धोम धरणातून कृष्णेत 30 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे... कोयना धोम धरणातून कृष्णेत 71 हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग... सांगलीत पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता...
1.50 मुंबई -धारावीच्या राजीव गांधी परिसरात झोपडपट्टीच्या मागे असलेल्या खाडीच्या पाण्यात 23 वर्षीय तरुण वाहून गेला. राजा मेहबूब शेख असे बेपत्ता तरुणाचे नाव... अग्नीशामक दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल...अद्याप तरुणाचा शोध लागलेला नाही
गोंदिया 1.25 - मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; इनोव्हा बोलेरोला धडकली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या महाजनादेश यात्रा सुरू आहे. आज यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्याच्या गाड्यांचा ताफा गोंदियावरून अर्जुनी-मोरगाव या ठिकाणी जात असताना अर्जुनी-मोरगाव जवळील नवेगावबांधजवळ ताफ्यातील बोलेरो गाडीला इन्होव्हा गाडीने धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. ताफ्याचे नियोजन नसल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
12:37 रायगड -पेणमधील दुष्मी (खारपाडा) गावाजवळ रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळली, कोकणात जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्या बंद, दरड बाजूला काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू
वसई-विरार -महापारेषणच्या वसई येथील १००MVA उपकेंद्रात पाण्याची पातळी वाढली असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या सबस्टेशन मधील विद्युतयंत्रणा सकाळी ०६.३० वा. बंद करण्यात आली आहे. यामुळे महावितरणचे वसई, गिरीज, संदोर, कौलार, नवघर औद्योगिक वसाहत, सातीवले औद्योगिक वसाहत, अग्रवाल औद्योगिक वसाहत, सनसिटी, वसई पश्चिम, मानवेलपाडा आदी परिसरातील सुमारे दीड लाख ग्राहक प्रभावित झाले आहेत.
12:38मुंबई -अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. भातसा रिव्हर क्रॉसिंगला धसई व आसनगाव फिडरला पाणी लागल्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शहापूर स्वीचिंगमध्ये पाणी घुसले आहे. गुजराथी बाग शहापूर येथे पाणी घुसल्याने मीटरला पाणी टेकत असल्याने सुरक्षेसाठी शहापूर टाऊन बंद ठेवण्यात आला आहे.
12:45 नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या शहर व ग्रामीण भागातील शाळांसाठी सुट्टी जाहीर केली आहे.
12:42 रायगडमध्ये राजधानी एक्स्प्रेस अडकली आहे
12.46 नाशिकजिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणांमधून आज सकाळी आठ वाजता खालील प्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे
गेल्या २४ तासांमध्ये त्रंबकेश्वर, आंबोली या परिसरात २०० ते ३०० मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झाल्यामुळे गंगापूर, कश्यपी, गौतमी या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणामधून होणारा पाण्याचा विसर्ग ठराविक अंतराने वाढवला जाणार आहे. याचा परिणाम म्हणजे नाशिक शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू असून सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
12.52 मुंबई - आरे कॉलनी रस्ता बंद
मुसळधार पावसामुळे पवई तलाव परिसरात पाणीच-पाणी साचले आहे. शिवाय विहार तलाव ओव्हर फ्लो झाल्याने मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे मिठी नदीचे पाणी पवई-आरे कॉलनी रस्त्यावर आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ज्यांना पवईला यायचे आहे त्यांनी आरे रोडचा वापर न करता पवई गार्डन रस्त्याचा वापर करावा तर ज्यांना पाश्चिम द्रुतगती मार्गाने यायचे असेल त्यांनीही आरे रोडचा वापर न करता महामार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
11.52 बीड -आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद मेळाव्यापूर्वी गेवराईत कोसळला सभा मंडप
11.47 रायगड -अलिबाग शहर जलमय.. पहिल्यांदाच शहराला बसला पुराचा फटका
जखमींची नावे -
मोहम्मद शेख (वय15), झुबेदा शेख (वय 70), अहमद शेख (वय14) अब्दुल शेख (वय 42) ... सर्वांची प्रकृती स्थिर
11.20 नाशिक -जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे रेल्वे सेवेवर परिणाम.... कसारा ते कल्याण रेल्वे ट्रक वर पाणी साचले... नाशिकहुन मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वे रद्द ... सेवाग्राम एक्सप्रेस, राजराणी एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस रद्द... इगतपुरी रेल्वे स्थानकात पहाटे पाच वाजल्यापासून दुरांतो एक्सप्रेस उभी..चाकरमान्यांचे हाल..
11.07 रत्नागिरी -जिल्ह्यात मुसळधार बरसात सुरूच... 24 तासात 153 मिमी पावसाची नोंद...दापोली तालुक्यात सर्वाधिक 225 मिमी पाऊस
11.05 -गुजरात -मुसळधार पावसामुळे बरूच जिल्ह्यातील नांदिडा गावात भिंत कोसळली. भिंतीखाली दबून ३ मुलांचा मृत्यू
11.01 मध्यप्रदेश -बारवानीच्या निवळी भागात बस आणि कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू तर १० जण जखमी, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
10.55नाशिक -धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीला महापूर येण्याची शक्यता, नाशिकच्या मुख्य बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी..
10.40ठाणे -बारवी धरण ओव्हरफ्लो, बारवी, उल्हासनगर नदी व खाडी काठच्या नागरिकांच्या घरात शिरले पुराचे पाणी, सकाळी पाच वाजल्यापासून समुद्राला भरती आल्याने कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा, भिवंडी, अंबरनाथ शहरात सकल भागात चोहीकडे पाणीच-पाणी साचले आहे... रात्रीपासून संततधार पाऊस सुरूच
10.29 -कल्याण -अंबरनाथ मार्ग बंद, तर कल्याण-नगर मार्गावरील चोहीकडे पाणीच पाणी, कल्याण-नगर महामार्गावरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प