महाराष्ट्र

maharashtra

मुंबईसाठी अप्पर वैतरणा धरणातून सोडले ५० दशलक्ष घनमीटर पाणी - जयंत पाटील

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

By

Published : Jul 3, 2020, 4:58 PM IST

Published : Jul 3, 2020, 4:58 PM IST

Jayant Patil
जयंत पाटील

मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता आहे. कोट्यवधी मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. एक ट्विट करत पाटील यांनी ही माहिती दिली.

मुंबईला पाणी पुरवणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा शिल्लक आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. सध्या पावसाला सुरुवात झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते. मात्र, आता वैतरणा धरणातून ५० दशलक्ष क्युबिक मीटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details