मुंबई -राज्यात लॉकडाऊन लागू झाल्यापासून सोशल मीडियावरून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा व अफवा पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांच्या विरोधात राज्याच्या सायबर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यभरात लॉकडाऊनच्या काळात 494 गुन्ह्यांची नोंद झाली असून याप्रकरणी 261 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
लॉकडाऊन काळात राज्यात 494 सायबर गुन्हे दाखल, 261 आरोपींना अटक - सायबर क्राइम महाराष्ट्र
लॉकडॉऊन काळात राज्यभरात वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फॉरवर्डप्रकरणी 195, फेसबुक पोस्ट प्रकरणी 203 गुन्हे दाखल झाले असून टिकटॉक व्हीडिओ शेअर केल्याप्रकरणी 26 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
![लॉकडाऊन काळात राज्यात 494 सायबर गुन्हे दाखल, 261 आरोपींना अटक cyber crime maharashtra cyber crime in lockdown cyber crime news लॉकडाऊनमधील सायबर क्राईम सायबर क्राईम महाराष्ट्र सायबर क्राईम न्यूज](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7719470-1054-7719470-1592809876455.jpg)
लॉकडॉऊन काळात राज्यभरात वादग्रस्त व्हॉट्सअॅप पोस्ट फॉरवर्डप्रकरणी 195, फेसबुक पोस्ट प्रकरणी 203 गुन्हे दाखल झाले असून टिकटॉक व्हीडिओ शेअर केल्याप्रकरणी 26 गुन्हे दाखल झाले आहेत. ट्विटरद्वारे चुकीचा मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल झाले असून इंस्टाग्रामवर चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर युट्युबवर ऑडिओ क्लिप टाकून गैरवापर केल्याप्रकरणी ५७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक 52 सायबर गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यानंतर पुणे ग्रामीण विभागात 41, जळगाव 34, मुंबई 29, नाशिक ग्रामीण 18 , कोल्हापूर 17 , सांगली 15 ,बुलडाणा 15, ठाणे शहर 15, सातारा 14, जालना 13, नांदेड 13, नवी मुंबई 13, नाशिक शहर 12, अहमदनगर 12 , ठाणे ग्रामीण 11, पालघर 11, लातूर 11, नागपूर शहर 10 असे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. राज्यातील या जिल्ह्यांत समाज माध्यमांचा गैरवापर अधिक होत असल्याचे दिसून आले आहे.