महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 27, 2019, 7:35 PM IST

Updated : Mar 29, 2019, 3:19 PM IST

ETV Bharat / state

शिवाजी कर्डीलेंची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर

शिवाजी कर्डीलेंची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर...जनतेला संबोधित करत गडकरींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप...तिकीट कापण्याची धमकी देत माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले; ए.टी. पाटलांचा गौप्यस्फोट...यासारख्या इतर राजकीय घडामोडींचा वाचा आढावा...

मतकंदन

  • शिवाजी कर्डीलेंची विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपमध्ये येण्याची ऑफर

अहमदनगर - राहुरी तालुक्याचे भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी आज विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. लोकसभेची निवडणूक झाल्या नंतर विधानसभेचा निवडणुकीच्या वेळी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील जर भाजपात आले तर मी त्यांना मंत्री करण्याची मागणी करणार आहे. अशी खुली ऑफर भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले यांनी राधाकृष्ण विखे पाटलांना दिली आहे. वाचा सविस्तर

  • जनतेला संबोधित करत गडकरींनी आचारसंहितेचे उल्लंघन केले, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचा आरोप

नागपूर- नितीन गडकरींनी २५ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी जनतेला संबोधित केले हा आचारसंहितेचे उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्याचबरोबर या संदर्भात उद्या निवडणूक अधिकाऱयांकडे गडकरींविरोधात तक्रार करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. वाचा सविस्तर

  • काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणांकडून घेतले एकनिष्ठेचे आश्वासन

अमरावती- काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमान आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा या विजयी झाल्यावर भाजपत तर जाणार नाहीत, तसेच जिल्ह्यातील राजकारणात काँग्रेसमध्ये ढवळा-ढवळ करून विधनसभा निवडणुकीत दर्यापूर आणि मेळघाट मतदारसंघात काँग्रेसला अडथळा तर आणणार नाहीत, अशा विविध शंकांचे निरसन करून काँग्रेसने आमदार रवी राणा आणि लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांच्याकडून एकनिष्ठेचे आश्वासन घेतले. वाचा सविस्तर

  • समृद्धी महामार्गाविरोधातील आंदोलन; तब्बल २ वर्षांनंतर राजू शेट्टींसह पाच जणांवर गुन्हा दाखल

नाशिक -दोन वर्षांपूर्वी राजू शेट्टी यांनी समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलन केले होते. याप्रकरणी आज त्यांच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी खासदार राजू शेट्टी यांनी नाशिक जिल्ह्यातील शिवडे या गावात जाऊन समृद्धी महामार्गाविरोधात जाहीर सभा घेतली होती.

  • वैज्ञानिकांचं कर्तृत्व आहे त्यांना सांगू द्या, तुम्ही कशाला सांगता; राज ठाकरेंच पंतप्रधानांवर ट्विटास्त्र

मुंबई - एका अंतर्गत चाचणीचा भाग म्हणून वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्राद्वारे उपग्रह पाडला. या कामगिरीसाठी वैज्ञानिक अभिनंदनास पात्र आहेत. अभिमान बाळगावा अशी ही कामगिरी आहे. पण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करुन ही बातमी सांगायची काय गरज? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी याविषयी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर

  • प्रितम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण

बीड -भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्या उमेदवारी अर्जासोबत दिलेली माहिती खोटी आहे. याशिवाय बहुतांश माहिती दडवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आक्षेप घेतल्यावरूनच माझ्यावर जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिसांसमोर पंकजा मुंडे व भाजपच्या गुंडांनी हल्ला केला, असा आरोप दादासाहेब मुंडे या काँग्रेस कार्यकर्त्याने केला आहे. वाचा सविस्तर

  • तिकीट कापण्याची धमकी देत माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले; ए.टी. पाटलांचा गौप्यस्फोट

जळगाव - लोकसभा निवडणुकीचे तिकीट कापल्यामुळे भाजप खासदार ए.टी. पाटील हे बंडाच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पाटील यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. तिकीट कापण्याची धमकी देऊन माझ्याकडून कोट्यवधी रुपये उकळले असल्याचा गौप्यस्फोट पाटील यांनी केला. वाचा सविस्तर


  • किरीट सोमय्यांना पर्याय नाही, शिवसैनिकांची समजूत काढणार - मुख्यमंत्री

मुंबई - ईशान्य मुंबईचे भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध आहे. मात्र सोमय्या यांना पर्याय नसल्याने त्यांच्या उमेदवारीसाठी थेट मुख्यमंत्री मध्यस्थी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईशान्य मुंबईतील ज्येष्ठ शिवसैनिकांना वर्षा निवासस्थानी बोलावले आहे. त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत. वाचा सविस्तर

  • गिरीश बापटांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार - संजय काकडे

पुणे - गिरीश बापट आणि माझ्यात मतभेद होते, मात्र मनभेद नव्हता. आता उमेदवारी घोषित झाल्याने आमचे मनोमिलन झाले आहे. बापट यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर


  • राज्याचं लक्ष लागलेल्या माढ्यातून मोहिते-पाटील पुता-पुत्रांपैकी एकाला संधी?

सोलापूर - माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवारीचा सस्पेंस आज संपण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजितसिंह मोहिते-पाटील या पिता-पुत्रांना कागदपत्रे तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने मोहिते-पाटलांना मैदानात उतरविले तर माढ्यात बिग फाईट पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर

  • नाशकात राष्ट्रवादीच्या घड्याळ्याला 'इंजिना'ची गती; भुजबळांच्या भेटीला मनसैनिकांची रीघ

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकतेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदी- शाह यांना बाजूला करण्यासाठी कोणालाही मदत करा, असे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. त्याचाच फायदा नाशिकमध्ये भुजबळांना होताना दिसून येत आहे. नाशिक लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना तिकीट देण्यात आले आहे. दरम्यान मनसे अध्यक्षांच्या आदेशानुसार नाशकात मनसे कार्यकर्ते छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्याच्या फार्म हाऊसवर गर्दी करत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.वाचा सविस्तर

  • ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांना मिळणार तिकीट ?, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

मुंबई - भाजपचा भांडूप येथील कार्यकर्ता मेळावा हाऊसफुल्ल झाला. यावेळी ईशान्य मुंबईचे खासदार तथा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मला पक्षाने तयारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे संभ्रमात न राहता कामाला लागले पाहिजे, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले. मंत्री प्रकाश मेहता यांनीही तसेच आदेश दिल्याने किरीट सोमय्या यांची ईशान्य मुंबईतून उमेदवारी निश्चित मानली जात आहे. वाचा सविस्तर

  • अब की बार बस कर यार; अशी गत झालीय या सरकारची- अशोक चव्हाण

हिंगोली - हे सरकार पूर्णतः भिकारी असून, जनतेला पैसा पुरवण्याऐवजी जनतेच्याच खिशातून पैसे काढणारे सरकार आहे. त्यामुळे जनता कंटाळली असून पूर्वी अब की बार मोदी सरकार म्हणणारी जनता. आता अब की बार बस कर यार, असे म्हणत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले. वाचा सविस्तर

Last Updated : Mar 29, 2019, 3:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details