महाराष्ट्र

maharashtra

दुष्काळी लातुरात 'उजनी'च्या पाण्यावरून राजकारण तापले, पुन्हा होणार रेल्वेने पाणीपुरवठा?

By

Published : Sep 14, 2019, 5:54 PM IST

Updated : Sep 14, 2019, 7:18 PM IST

पावसाळा संपत आला तरी लातुरात सरासरीच्या तुलनेत केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठे धरणे आणि प्रकल्प तर सोडाच गावालगतच्या नद्या- ओढ्यानाही पाणी नाही. पावसाळ्यात ५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून शंभरहून अधिक जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ही भीषण स्थिती निर्माण झाली असून पुन्हा लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार, अशी सध्याची अवस्था आहे.

लातूर दुष्काळ

लातूर- अपेक्षेप्रमाणे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा येथील राजकीय नेत्यांना उजनीच्या पाण्याची आठवण झाली आहे. लातूरकरांना पाणी मिळो अथवा न मिळो मात्र, २० वर्षापसून गाजत असलेल्या काल्पनिक विषयाचा फायदा राजकीय नेत्यांनी सोईस्कररित्या घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील पाण्याबाबतची स्थिती प्रतिकूल नसली तरी राजकीय नेत्यांसाठी हा मुद्दा अनुकूल आहे. त्यामुळेच आता उजनीच्या पाण्यावरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे.

'उजनीचे पाणी लातूरला आणूच, नाहीतर....'

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या भेटीचे राजकरण नको - इंदोरीकर महाराज

पावसाळा संपत आला तरी लातुरात सरासरीच्या तुलनेत केवळ ५१ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे मोठे धरणे आणि प्रकल्प तर सोडाच गावालगतच्या नद्या- ओढ्यानाही पाणी नाही. पावसाळ्यात ५६ टँकरने पाणीपुरवठा केला जात असून शंभरहून अधिक जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ही भीषण स्थिती निर्माण झाली असून पुन्हा लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागणार, अशी सध्याची अवस्था आहे. एवढेच नाही तर जिल्हा प्रशासन त्या तयारीला लागले आहे. त्यामुळेच निवडणुकांच्या तोंडावर सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न येथील राजकीय नेत्यांनी प्रचाराचा मुख्य अजेंड्यावर घेतला आहे.

हेही वाचा - सत्ताधारी धर्माच्या नावाने दहशत निर्माण करतायेत; पवारांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

विधानसभेची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रमुख दावेदार असलेले पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि लातूर शहरचे आमदार अमित देशमुख यांनी प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाच्या प्रचार शुभारंभातच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी निवडून आल्यांनतर दोन वर्षात जर उजनीचे पाणी लातूरला नाही आणले तर आहे त्या पदाचा राजीनामा देऊन घरी बसेन, असे सांगितले आहे. दुसरीकडे आमदार अमित देशमुखही राज्यात सरकार स्थापन झाले की उजनीचे पाणी लातूरकरांना मिळवून देणारच असल्याची भाषा करत आहेत. त्यामुळे उजनीच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेच्या तोंडावर अधिरेखित झाला आहे.

हेही वाचा - हिंगणाचे माजी भाजप आमदार विजय घोटमारे राष्ट्रवादीत; शरद पवार यांच्या उपस्थितीत केला प्रवेश

प्रत्यक्षात सध्या मात्र, लातूरकरांना महिन्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. तर, अनेकांना विकतच्या पाण्यावर तहान भागवावी लागते हेच वास्तव.

Last Updated : Sep 14, 2019, 7:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details