लातूर- लग्नाहून गावाकडे परतणाऱ्या दुचाकीस्वाराला मद्यधुंदीत असलेल्या पोलिसाने आपल्या स्विफ्ट कारने उडवल्याने दुचाकीवरील तिघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चाकूर तालुक्यातील घरणीजवळ रविवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. यातील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बाकली (ता. शिरूर अनंतपाळ) येथील मनोहर केराबा कांबळे (50), आनंद शेषेराव कांबळे (35) व लक्ष्मण मनोहर कांबळे हे लग्नासाठी नांदगावला गेले होते. लग्न समारंभ आटोपून गावाकडे जात असताना नळेगाव - घरणी दरम्यानच्या पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या स्विफ्ट कार (एमएच.04 ईटी 1415) ने जोराची धडक दिली.