महाराष्ट्र

maharashtra

लातूरकर पाण्याला तरसणार, प्रत्येक कुटुंबाला मिळणार आता २०० लीटर पाणी

By

Published : Sep 18, 2019, 7:09 PM IST

Updated : Sep 18, 2019, 9:07 PM IST

दिवसाला प्रत्येक कुटुंबाला २०० लीटर पाणी दिले जाणार, अशी माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी दिली.

लातूरकर पाण्याला तरसणार

लातूर -पंधरा दिवसातून एकदा होणारा पाणीपुरवठा आता एक ऑक्टोबरपासून बंद करण्यात येणार आहे. मांजरा धरणातील शिल्लक पाणी जपून वापरण्याच्या अनुशषंगाने आता जिल्हा प्रशासनाने नवे पाऊल उचलले आहे. दिवसाला प्रत्येक कुटुंबाला २०० लीटर पाणी दिले जाणार आहे, अशी माहिती होणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली.

लातूरकर पाण्याला तरसणार, प्रत्येक कुटुंबाला मिळणार आता २०० लीटर पाणी

हेही वाचा - लातूरमध्ये पाणीटंचाईचा बळी; कोरड्या विहिरीत ट्रॅक्टर पडल्याने एकाचा मृत्यू

पाणीटंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून पाणीदेखील मोजून वापरण्याची वेळ लातूरकरांवर आली आहे. पावसाळा सुरू होताच लातूरकरांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरवात झाली होती. ८ दिवसाचा पाणीपुरवठा १० दिवासांवर आणि आता १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र, मांजरा धरणातील घटती पाणीपातळी यामुळे जिल्हा प्रशासनाने एक ना अनेक प्रयत्न केले. परंतू, पावसाने दडी मारल्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये शिवाय शिल्लक असलेल्या ४.५ दलघमी पाण्याचा जपून वापर होईल या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा - लातूर : आयकर विभागाकडून तीन खासगी क्लासवर छापा; विद्यार्थ्यांना सुट्टी

निर्णयानंतर ज्या कुटूंबातील सदस्य संख्या अधिक असेल त्यांचे काय असा सवाल आता लातूरकर व्यक्त करत आहेत. १ ऑक्टोबरपासून या नव्या नियमावलीची अंमलबजावणी होणार आहे. २०० लीटर पाणी हे टँकरद्वारे दिले जाणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात मांजरा धरणासाठ्यात पाण्याची साठवणच झाली नसल्याने ही नामुष्की ओढावली आहे.

हेही वाचा - रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखान्याला आग.. आग्निशामक दल घटनास्थळी

Last Updated : Sep 18, 2019, 9:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details