महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 20, 2020, 11:10 AM IST

ETV Bharat / state

निलंगा तालुक्यातील 6 कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा तपास सुरू

विनापरवानगी मुंबईहून आलेल्या वाहनामध्ये एकूण 16 लोक आले होते. त्यापैकी सहा जण कोरोनाबाधित असून त्यांना ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कातील उर्वरीत दहा जणांचा शोध प्रशासन घेत आहे.

कोराळी येथिल सहा पाॕझीटीव्ह असलेल्या लोकांच्या संपर्कातील त्या २१ जणांचा प्रशासनाकडून  शोध सुरू
कोराळी येथिल सहा पाॕझीटीव्ह असलेल्या लोकांच्या संपर्कातील त्या २१ जणांचा प्रशासनाकडून शोध सुरू

निलंगा (लातूर) - निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एकाच कुटुंबातील 6 कोरोनाबाधित झाले आहेत. मुंबईपासून त्यांच्या संपर्कात असलेल्या दहा जणांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे. मात्र, ते विनापरवाना ज्या वाहनाने पोहचले त्या वाहनाचाही थांगपत्ता लागला नसल्याची बाब समोर आली आहे. कोराळी गाव 14 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. तर, कोराळी शेजारचे कासार शिरसी गाव हे तीन दिवस बंद ठेवण्यात आले असून त्या 6 पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

निलंगा तालुक्याच्या कोराळी येथील हे कुटुंब मुंबईत राहत होते. शनिवारी सायंकाळच्या सुमारास मुंबईवरून हे कुटुंब कोणताही परवाना न घेता गावात येऊन घरामध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून सरपंच कल्पना गायकवाड यांनी लागलीच त्यांच्या घराला बाहेरून टाळे ठोकले होते. नंतर त्यांना थेट रुग्णालयात पाठवल्यामुळे ह्या लोकांचा कोणाशीही संपर्क झाला नाही. मात्र, मुंबईहून येताना वाहनामध्ये एकूण 16 लोक आले होते. त्यापैकी सहाजण कोरोनाबाधित झाले असून त्यांच्या संपर्कातील उर्वरीत दहा जणांचा शोध प्रशासन घेत आहे. तर, या 6 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची माहिती आहे.

एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहीती समोर आल्याने पुन्हा एकदा निलंगा तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून नागरिक हादरून गेले आहेत. शिवाय ज्या वाहनामध्ये हे लोक विनापरवानगी आले आहेत त्यापैकी तीनजण तालुक्यातील अनसरवाडा, दोन लांबोटा आणि एकाला निलंगा येथे सोडण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता त्यांच्या संपर्कातील 8 व त्या 8 जणांच्या संपर्कातील 13 जणांचा शोध घेऊन त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. आतापर्यंत निलंगा येथील विलगीकरण कक्षात 12 जणांना ठेवण्यात आले आहे.

पुणे- मुंबईवरून मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या गावाकडे परतत आहेत. त्यामुळे गावच्या सुरक्षेचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होणार असल्याची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details