महाराष्ट्र

maharashtra

तब्बल ७२ दिवसांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू, इंटरनेट अद्याप नाही

By

Published : Oct 14, 2019, 11:45 AM IST

Updated : Oct 14, 2019, 1:32 PM IST

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी याविषयी शनिवारी माहिती दिली. 'जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता येथील उर्वरित क्षेत्रांमध्येही मोबाइल फोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर 2019 पर्यंत या सेवा काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये पूर्ववत सुरू होतील,' असे ते म्हणाले.

जम्मू-काश्मीर

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल 370 हटवल्यानंतर मोबाईल सेवा खंडित करण्यात आल्या होत्या. हे निर्बंध आज (सोमवार) हटवण्यात येणार आहेत. सर्व पोस्टपेड मोबाईल सेवा दुपारी 12 वाजल्यापासून सुरू झाल्या. मात्र, इंटरनेट सुविधा सुरू झालेल्या नाहीत. तरीही मोबाईलवरून संपर्क सुरू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्य सचिव रोहित कन्सल यांनी याविषयी शनिवारी माहिती दिली. 'जम्मू-काश्मीरमधील सध्याची परिस्थिती पाहता येथील उर्वरित क्षेत्रांमध्येही मोबाईल फोन सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी 14 ऑक्टोबर 2019 पर्यंत या सेवा काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये पूर्ववत सुरू होतील,' असे ते म्हणाले.

हेही वाचा - सिलेंडरच्या स्फोटात कोसळली इमारत; 7 ठार, तर 15 जण जखमी

५ ऑगस्टला आर्टिकल 370 हटवल्यानंतर केंद्राने या भागातील सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व नेटवर्क आणि लँडलाईन कनेक्शन जम्मू-काश्मीरमधून हटवले होते. मात्र, आतापर्यंत टप्प्याटप्प्याने बहुतांशी ठिकाणी लँडलाईन कनेक्शन सुरू झाले आहेत. मात्र, काश्मीरच्या संवेदनशील भागांमध्ये आतापर्यंत मोबाईल सेवा प्रतिबंधित होत्या. आता त्या सुरू करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा - पाकिस्तानचे ड्रोन पकडण्यासाठी संघटित योजना आवश्यक - माजी डीजीपी सिंह

Last Updated : Oct 14, 2019, 1:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details