महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लोकसभा निकालाचा परिणाम विधानसभेवर; लातुरात काँग्रेससाठी धोक्याची घंटा - लातूर

लोकसभा निवडणुकीत ११ लाख ८० हजार मतदान झाले होते, यापैकी ५० टक्यांहून अधिकचे मतदान भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना मिळाले आहे. तर काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामंत यांना ३ लाख ७० हजारावर समाधान मानावे लागले आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राम गारकर यांना १ लाखाहून जास्त मते मिळाली असली तरी याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे.

लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेवर?

By

Published : May 25, 2019, 5:58 PM IST

लातूर- १७ व्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मताधिक्य २०१४ पेक्षा वाढले आहे. राज्यात मात्र या वाढलेल्या मताधिक्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होणार हे नक्की आहे. तसेच काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लोकसभेच्या लातूर मतदारसंघात एकाही विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आाघाडी मिळाली नाही. आघाडी तर दूरच परंतु गतवेळपेक्षा यंदाच्या निवडणुकीत अधिकची मते घटली आहेत. यामुळे लातूर शहरासह लातूर ग्रामीण आणि औसा या काँग्रेसच्या ताब्यातील विधानसभा मतदारसंघात काँग्रेससाठी धोक्याची 'घंटा' मानली जात आहे.

लोकसभेच्या निकालाचा परिणाम विधानसभेवर?


लोकसभा निवडणुकीत ११ लाख ८० हजार मतदान झाले होते, यापैकी ५० टक्यांहून अधिकचे मतदान भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना मिळाले आहे. तर काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांना ३ लाख ७० हजारावर समाधान मानावे लागले आहे. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार राम गारकर यांना १ लाखाहून जास्त मते मिळाली असली तरी याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे.


काँग्रेसकडे लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा या विधानसभा आहेत. या तीनही ठिकाणी गतवेळपेक्षा अधिकचे मताधिक्य भाजपच्या पारड्यात पडले आहे. लातूरच्या ग्रामीण भागात देशमुख यांचे साखर कारखाने आहेत. त्या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन आणि कारखान्यांवरील कामगारांचा गट यामुळे या मतदारसंघात काँग्रेसचा गड कायम राहिला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मताधिक्यम मिळते. मात्र, यंदा यामध्ये वाढ झाल्याने काँग्रेसच्या अडचणीत भर पडली आहे. या विधानसभा मतदारसंघात भाजप तब्बल ३५ हजार मताने आघाडीवर राहिले आहे.


लातूर शहर विधानसभेचे आमदार अमित देशमुख असून या मतदारसंघातही भाजपला ६ हजारांची लीड मिळाली. त्यामुळे या जागेसाठीही काँग्रेसला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. यातच पालकमंत्री संभाजी पाटलांनी अमित देशमुखांनी इतर जागावांर लक्ष देण्यापेक्षा लातूर शहरावर लक्ष्य केंद्रीत केले असते तर चार-दोन मते वाढली असती, असा टोला लगावला आहे.


शहर, ग्रामीण पाठोपाठ औसा जागेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. परंतु, हा मतदारसंघ लोकसभेसाठी उस्मानाबाद मतदारसंघात आहे. या ठिकाणी भाजपला ५४ हजारांची मिळाली आहे. ही आघाडी विद्यमान आमदार बसवराज पाटील यांना नक्कीच जिव्हारी लागणारी आहे. इतर अहमदपूर, निलंगा आणि उदगीर मतदार संघात मताधिक्य घेऊन आपलेच वर्चस्व कायम असल्याचे येथील भाजपच्या आमदारांनी दाखवून दिले. अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजे ७० हजाराची लीड भाजपला मिळाली आहे.


त्यामुळे या तीनही जागेचा गड कायम राखून इतर जागांवर आमदार अमित देशमुख यांना आपले अस्तित्व दाखवून द्यायचे असेल तर विधानसभेसाठी वेगळीच रचना आखावी लागणार आहे. अन्यथा लोकसभेच्या निकालावरून विधानसभेत काय होईल, हे वेगळे सांगायची गरज नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details