महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 4, 2019, 5:42 PM IST

ETV Bharat / state

लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ असून यंदा शिवसेनेला सोडण्यात आला आहे. त्यामुळे भाजप इच्छुक रमेश कराड समर्थकांनी, 'परत द्या, परत द्या लातूर ग्रामीण परत द्या' अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या रास्ता रोकोमुळे लातूर-अंबाजोगाई नॅशनल हायवेवर वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

भाजपा कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

लातूर- लातूर ग्रामीण हा परंपरागत भाजपचा मतदारसंघ असून यंदा शिवसेनेला सोडण्यात आला आहे. या मतदारसंघात शिवसेनेची ताकत नसतानाही घेण्यात आलेल्या निर्णयाच्या निषेधार्थ लातूर ग्रामीण मतदार संघातील रेणापूर तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांनी रेणापूर फाटा येथे रास्ता रोको केला.

भाजपा कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

हेही वाचा-राणे समर्थक सतीश सावंत कणकवलीतून अपक्ष लढणार; नितेश राणेंना फोडणार घाम?

भाजप इच्छुक रमेश कराड समर्थकांनी, 'परत द्या, परत द्या लातूर ग्रामीण परत द्या' अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. या रास्ता रोकोमुळे लातूर-अंबाजोगाई नॅशनल हायवेवर वाहतूक तासभर ठप्प झाली होती. भाजपची मजबूत आणि भक्कम ताकत असलेला लातूर ग्रामीण मतदारसंघ अचानक शिवसेनेला सोडून लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे नामोनिषान पुसून टाकण्याचा घाट पक्षश्रेष्ठीने घातल्याचे दिसत आहे. मुंडे यांनी अठरा पगड जातीला सोबत घेवून महाराष्ट्रात भाजपच्या विचाराचे आणि संघर्षाचे राजकारण केले. या मतदार संघाची जबाबदारी रमेशअप्पा कराड यांच्यावर सोपविली. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात भाजपची मोठी ताकत असल्याने यावेळी विजय निश्चित असताना ऐनवेळी हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आला. यामुळे कार्यकर्त्यांत तिव्र नाराजी पसरली आहे.

हेही वाचा-जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उमेदवार अर्ज दाखल

निर्णय घेताना भाजपच्या कोणत्याही लोकप्रतिनीधीला, पक्ष पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. दुर्दैवाने पक्षश्रेष्ठीने जागावाटपाचा चुकीचा घेतलेला निर्णय बदलून लातूर ग्रामीणची जागा परत भाजपकडे कायम ठेवावी. अशीही मागणी घेवून लातूर ग्रामीण मतदार संघातील रेणापूर तालुक्यातील भाजपचे हजारो कार्यकर्त्यांनी हातात आपल्या मागणीचे फलक घेवून रेणापूर फाटा येथे नॅशनल हायवेवर भर रस्त्यावर ठिय्या दिला. यावेळी अनिल भिसे, दशरथ सरवदे, अभिषेक अकनगिरे, अनंत चव्हाण, वसंत करमुडे, श्रीकिसन जाधव, रमेश सोनवणे यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनीधी, पदाधिकारी, अनेक गावचे सरपंच कार्यकर्ते उपस्थीत होते.

दरम्यान, लातूर ग्रामीणमधून दिवंगत नेते विलासराव देमुख यांचे धाकटे चिरंजीव धीरज देशमुख रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ त्यांचेच बंधू सिने अभिनेते रितेश देशमुख यांनी कबंर कसली आहे. त्यामुळे लातूर ग्रामीणची निवडणूक एकतर्फी होते की काय ? अशीची सद्याची स्थिती आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details