महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही इम्पॅक्ट : लातूरच्या शिवणी बॅरेजच्या चौकशीचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश - लातूरच्या मांजरा नदीवरील बंधारा

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीवरील शिवणी प्रकल्प पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला होता. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक पाणी साचल्याने दरवजा उघडण्यात आला, तो पुन्हा तांत्रिक बिघाडाने बंदच झाला नाही. आता या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे.

शिवणी बॅरेजच्या चौकशीचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश
शिवणी बॅरेजच्या चौकशीचे पालकमंत्र्यांनी दिले आदेश

By

Published : Oct 14, 2020, 9:34 PM IST

लातूर - जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र अशा परिस्थितीत लातूर तालुक्यातील शिवणी बॅरेजचा दरवाजा अचानक उघडल्याने या प्रकल्पातील पाणी वाहून गेले. पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प तुडुंब भरला होता. मात्र, क्षमतेपेक्षा अधिक पाणी साचल्याने दरवजा उघडण्यात आला, तो तांत्रिक बिघाडाने बंदच झाला नाही. परिणामी लाखो लिटर पाणी वाया गेले असून यासंबंधी 'ईटीव्ही भारत' सर्वात प्रथम वृत्त प्रकाशित केले होते. याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत.

लातूर तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे सर्वच पाटबंधारे प्रकल्पात पाणीसाठा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्री झालेल्या पावसामुळे मांजरा नदीपात्रातील पाणी वाढले. त्यामुळे शिवणी बॅरेजमध्ये अधिकचा पाणीसाठा झाल्याने स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आला होता. मात्र, तो वेळेत बंद न केल्याने या बॅरेजमधील पाणी वाहून गेले आहे. एकीकडे पाणी साठवणुकीसाठी जिल्हा प्रशासन सर्वकष प्रयत्न करीत आहे, तर दुसरीकडे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडून असा प्रकार समोर आला आहे. याची माहिती पालकमंत्री अमित देशमुख यांना मिळताच त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असला तरी इतर वेळी पाण्यासाठी नागरिकांनी भटकंती करावी लागते याची जाणीव अधिकारी आणि कर्मचारी यांनी ठेवायला पाहिजे. उपलब्ध पाणीसाठा योग्य प्रकारे वापरण्याची गरज असताना असा प्रकार झालाच कसा? हे गंभीर असून याची चौकशी करणे आवश्यक आहे. जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला असल्यास कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना दिले आहेत. त्यामुळे आता काय कारवाई होणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

बॅरेजमधून पाणी वाहून गेल्याचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते. शिवणी बॅरेजमधून तालुक्यातील बोरी, चामेवाडी धनेगाव, सेलू उमरगा, रमजानपुर, सुगाव, भाडगाव, सोनवती या गावाला पाणी पुरवठा केला जातो.

ABOUT THE AUTHOR

...view details