लातूर -जिल्ह्यासह सीमावर्ती भागात आज (रविवारी) बळीराजाचा ( Farmers ) महत्वाचा सण साजरा करण्यात आला. कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला बळीराजाचा सण म्हणजे 'येळवस' अर्थात वेळ आमावस्या ( Vel Amavasya ). यावर्षी या सणावर कोरोनाचे सावट असल्याने प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यापार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यात आला.
- अशी करण्यात आली तयारी
वेळ अमावस्या सणाची तयारी करताना चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी, भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो. वेळ अमावस्याच्या दिवशी पहाटे घराघरात चूल पेटते. बेसन पिठात कालवून चिंच आणि अंबिवलेल्या ताकाच्या पाण्यावर उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी म्हणजे भज्जी. ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी.
यासोबत दिले जाणारे अंबील म्हणजे चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल. भल्या थोरल्या भाकरी. गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत-गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली 'येळवस' दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो.
- काय आहे परंपरा?