महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 6, 2020, 5:33 PM IST

ETV Bharat / state

पत्नीच्या पाठोपाठ पतीची आत्महत्या; तीन वर्षाचा चिमुरडा ठरला निमित्त

लातूर तालुक्यातील भातंगळी येथील शिवारात राम गुणाजी नरवटे व त्यांची पत्नी शालूबाई (मूळचे चंद्रपूर) रोजगार म्हणून शिंदे यांच्याकडे काम करत होते. घरगुती कामावरुन या जोडप्याने आत्महत्या केली.

suicide news
पत्नीच्या पाठोपाठ पतीची आत्महत्या; तीन वर्षाचा चिमुरडा ठरला निमित्त

लातूर - क्षुल्लक कारणावरुन पती-पत्नीमध्ये झालेला वाद टोकाला गेला आणि यामध्ये पत्नी पाठोपाठ पतीनेही आत्महत्या केल्याची घटना भातगंळी शिवारात घडली आहे. तीन वर्षांच्या मुलाला वडिलांनी चापट मारली आणि यावरुनच पती-पत्नीमध्ये वाद झाला. त्यानंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली तर त्यापाठोपाठ पतीनेही विष सेवन करुन जीवन संपिवले. मात्र, तीन वर्षाचा चिमुरडा आता पोरका झाला आहे.

हेही वाचा - नाशकात पोलिसाची गुंडगिरी, फुकटात दारूची बाटली दिली नाही म्हणून बारमालकाला मारहाण

लातूर तालुक्यातील भातंगळी येथील शिवारात राम गुणाजी नरवटे व त्यांची पत्नी हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील सालगडी म्हणून शिंदे यांच्याकडे काम करत होते. शालूबाई व राम यांना तीन वर्षाचा एक मुलगाही होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन रागात असलेल्या राम नरवटे यांनी मुलाला चापट मारली. मुलाला का मारले? यावरुन शालूबाई आणि राम यांच्यात वाद झाला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद टोकाला पोहोचला आणि शालूबाई (वय-30) यांनी घरातच गळफास घेतला. तर पत्नीचे हे कृत्य पाहून राम यानेही अवघ्या काही वेळात विषारी द्रव सेवन करून जीवन संपिवले.

उपचारासाठी या दोघांनाही लातूर येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जगण्यासाठी स्थलांतर करुन आलेल्या या जोडप्याने आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, तीन वर्षाचा मुलगा आता अनाथ झाला आहे. या घटनेने भातंगळी परिसरात खळबळ उडाली आहे. लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - गांजा विक्रीची माहिती दिल्याच्या संशयावरून टोळक्याचा एकावर गोळीबार

ABOUT THE AUTHOR

...view details