लातूर- कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटावर मात करत शेतकरी कुटुंबाला घेऊन परिस्थितीशी दोन हात करतो. मात्र, एकाच वेळी दोन्ही संकट ओढवत असल्याने बळीराजा हा हताश झाला आहे. शिवाय सरकारची मदतही तुटपुंजी, त्यामुळे मुख्य व्यवसाय असलेली शेती ही आता बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे आता जगणेही मुश्कील झाले असल्याची भावना गातेगाव येथील शेतकऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.
खरिपाच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवल्याने सर्वच पिके अडचणीत होती. एवढेच नाही तर पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नही नागरिकांसह जिल्हा प्रशासनाला पडला होता. मात्र, गेल्या 15 दिवसांपासून परतीच्या पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे जी पिके पाण्याविना करपू लागली होती, तीच पिके आज पाण्यात गेली. निसर्गाचा लहरीपणा आता थेट शेतकऱ्यांच्या जीवनावर परिणाम करत आहे.
हेही वाचा - कर्जबाजारीपणाला कंटाळून लातुरात शेतकऱ्याची आत्महत्या