महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्या' - अतिवृष्टीमुळे लातुरात पिकांचे नुकसान

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी सावकारांकडून उसनवारी घ्यावी लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने लवकर मदतीचा हातभार लावला तर शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी थोडी मदत होईल, अशी आशा यावेळी सरपंचांनी व्यक्त केली.

पिकांचे नुकसान भरपाई देण्याची सरपंच संघटनेची मागणी

By

Published : Oct 30, 2019, 7:10 PM IST

लातूर- गेल्या पंधरा दिवसांपासून सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेल्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे सरकारने त्वरित पंचनामे करून तात्काळ सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे सरपंच संघटनेकडून करण्यात आली आहे.

'अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांना सरसकट नुकसान भरपाई द्या'

हेही वाचा -काजरोळकर यांच्या पुस्तकातून विद्यार्थ्यांना मिळणार वृत्तपत्रलेखनाचे धडे

लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यात गेल्या महिना भरापासून परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेल्या उभ्या व काढून ठेवलेल्या खरीप पिकांची मोठी हानी झाली आहे. तालुक्यात आजपर्यंत एकूण पावसाची सरासरी हजार, 900, 700 मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, ज्वारी अशा उभ्या पिकांना अंकूर फुटले आहेत. तर, काढून ठेवलेल्या पिकांचे ढिग कुजत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील आलेले पिके काढून दिवाळी साजरी करण्याऐवजी सावकाराकडून उसनवारी घेऊन दिवाळी साजरी करण्याची वेळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर आली आहे.

अशा अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी जळकोट तालुक्यातील 47 गावच्या सरपंचांनी आज जलकोटच्या तहसीलदारांना निवेदन देऊन या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून कोणत्याच अटी न लावता सरकारने सरसकट शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा -मुंबईत भाऊबीज उत्साहात साजरी

दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी शेतकऱ्यांना बाजारासाठी सावकारांकडून उसनवारी घेऊन सण साजरा करावा लागला. अशा बिकट परिस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारने लवकर मदतीचा हातभार लावला तर शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून सावरण्यासाठी थोडी मदत होईल, अशी आशा यावेळी सरपंचांनी व्यक्त केली.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details