महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निलंग्यात एस.टी वाहकांचे साखळी उपोषण, ई.टी.आय.एम. मशीनची मागणी

निलंगा आगारात ई.टी.आय.एम. मशीनचा तुटवडा आहे. त्यामुळे, वाहकांना मॅन्युअल ट्रेवर काम करावे लागत आहे. त्यामुळे, सर्व वाहकांना त्रास होत आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. तसेच, एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे.

By

Published : Sep 14, 2020, 5:21 PM IST

एस.टी वाहकांचे साखळी उपोषण
एस.टी वाहकांचे साखळी उपोषण

निलंगा (लातूर)- गेल्या अनेक दिवसांपासून एसटी महामंडळातील वाहकांकडून ई.टी.आय.एम. मशीनची मागणी होत आहे. मात्र, वारंवार मागणी करूनसुद्धा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने आज वाहकांनी निलंगा बसस्थानकासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. याबाबत मागण्यांचे निवेदन लातूर विभागीय नियंत्रक यांना देण्यात आले आहे.

निलंगा आगारात ई.टी.आय.एम मशीनचा तुटवडा आहे. त्यामुळे, वाहकांना मॅन्युअल ट्रेवर काम करावे लागत आहे. त्यामुळे, सर्व वाहकांना त्रास होत आहे. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत आहे. तसेच, एसटी महामंडळाच्या आर्थिक उत्पन्नावर देखील परिणाम होत आहे. मशीन अभावी सामान्यांनाही गैरसोय होत आहे. अपंग व्यक्तींची वन फोरची सवलत नोंद होत नसल्याने ७५ टक्के आर्थिक नुकसान होत आहे. बरेच जेष्ठ नागरिक स्मार्ट कार्डच्या सवलतीचा वापर करीत आहेत. मात्र, मशीन नसल्याने त्यांची ५० टक्के सवलत बुडत चालली आहे. तसेच, सरकारी पत्रकार, स्वतंत्र सैनिक, दलित मित्र, असे अनेक सवलती धारक, जे स्मार्ट कार्डचा वापर करतात त्यांची नोंद होत नसल्याने आर्थिक नुकसान होत आहे.

माहिती देताना राज्य कार्याध्यक्ष विष्णू माने

कोरोना परिस्थितीत मॅन्युअल ट्रे वापरल्याने जोड तिकिटे एकमेकास जोडून द्यावे लागतात. तसेच, सुरक्षेसाठी हँड ग्लोज घातल्याने तिकीट फाडता येत नाही, किंवा ते कमी अधिक जाण्याचा संभाव्य धोका असतो. त्यामुळे, ती पाहण्यासाठी बोटांचा वापर करीत असताना तोंडाचा संपर्क येतो. त्यामुळे, संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे. प्रवासी वर्गाचा जीव धोक्यात घालण्याचा हा प्रकार आहे. कोणताही नैतिक आधार नसल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे. या साखळी उपोषणात वाहक कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा-लातूर जिल्ह्यातील 43 केंद्रावर 'नीट' आयोजित ; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष काळजी

ABOUT THE AUTHOR

...view details