लातूर - 'केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे' या ब्रीदवाक्यला साजेल असे यश केशवराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी संपादन केले आहे. राज्यात २० विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. यामध्ये लातूर बोर्डातील १६ आणि एकट्या केशवराज विद्यालयाचे ६ विद्यार्थी आहेत. तर ९० टक्केपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या दीडशेहून अधिक आहे.
दहावीच्या निकालाचा टक्का घसरला असला तरी लातूर पटर्नच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तेचा डंका वाजविला आहे. १६ विद्यार्थ्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेत १०० टक्के मिळविले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला शाळेतील शिक्षकांची साथ मिळाल्याने हे यश मिळाले असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. देशीकेंद्र शाळेतील ३ तर केशवराज विद्यालयातील ६ विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.