कोल्हापूर - भुदरगड तालुक्यातील मौजे वासनोली पैकी जोगेवाडीवरील धनगरवाडा स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे रस्त्याविना वनवास भोगत असल्याचे चित्र आहे. अनेक वेळा आजारी रुग्णाला डोंगरातून वाट काढतच मुख्य रस्त्यापर्यंत चालत यावे लागते. पावसाळ्यात तर खूपच बिकट परिस्थिती बनते. नुकत्याच एका गरोदर महिलेलाही धनगरवाड्यावरील नागरिकांनी बांबूची डोली करून उपचारासाठी घेऊन यावे लागल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून नेमकं काय करतायेत असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- वासनोली पैकी जोगेवाडीवरील धनगरवाड्याला रस्त्याची मागणी :
भुदरगड तालुक्यातील वासनोली येथे जवळपास 200 लोकवस्तीचा धनगरवाडा आहे. या धनगरवाड्यावर जाताना जोगेवाडीतून दोन किलोमीटर चढून जावे लागते. उन्हाळ्यात धनगरवाड्यावर पायी ये-जा करता येते. मात्र, पावसाळ्यात खूपच बिकट परिस्थिती निर्माण होत असते. अनेकवेळा आपत्कालीन स्थितीत रुग्णांना तत्काळ हलवण्याची वेळ आल्यास त्यांना खांद्यावर उचलून घेऊन दोन किलोमीटर चालत नेण्यापासून पर्याय नसतो.
- बांबूच्या डोलीतून 2 किलोमीटर चालत आणले -