महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Woman Gave Birth Baby In Kolhapur : झोळीमध्येच दिला बाळाला जन्म; रस्ता नसल्याने नागरिक त्रस्त - गर्भवती महिलेने जंगलामध्येच बाळाला जन्म दिला बातमी

गर्भवती महिलेने जंगलामध्येच बाळाला जन्म दिल्याची कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा तालुक्यातल्या पेरणोली धनगरवाडा येथे घटना समोर आली आहे. (woman gave birth Baby on the road ) कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातल्या पेरणोली धनगरवाडा येथे ही घटना घडली. 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा ही घटना घडली असून सुदैवाने महिला आणि बाळ मात्र सुखरुप असल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो

By

Published : Feb 23, 2022, 10:58 AM IST

Updated : Feb 23, 2022, 11:05 AM IST

कोल्हापूर - रस्त्याअभावी महिलेला झोळीतून रुग्णालयात घेऊन जात असताना तिने जंगलामध्येच बाळाला जन्म दिल्याची घटना घडली आहे. कोल्हापूरातल्या आजरा तालुक्यातल्या पेरणोली धनगरवाडा येथे ही घटना घडली. 21 फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा ही घटना घडली असून सुदैवाने महिला आणि बाळ मात्र सुखरुप असल्याची माहिती महिलेच्या पतीने दिली आहे. (Woman Gave birth Baby On road) दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या नागरिकांना अशाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे कोणाचातरी जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा सवाल गावकऱ्यांनी केला आहे.

व्हिडिओ

गावातील 10-15 जणांनी मिळून झोळीतून आणावे लागले; वाटेतच प्रसूती

आजरा तालुक्यातल्या पेरणोली इथल्या धनगरवाड्यावरील जयवंत झोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नी रंजना जयवंत झोरे यांना 21 फेब्रुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास प्रसूतीकळा सुरु झाल्या. रस्ता नसल्याने त्यांना रुग्णालयात कसे घेऊन जायचे असा प्रश्न नातेवाईकांसमोर पडला. मात्र गावातील इतर 10-15 जणांनी मिळून घरातील चादरीची झोळी बनवून त्यातून घेऊन जाण्याचे ठरवले. रस्ता नसल्याने वाहन येऊ शकत नव्हते. शिवाय वाटेवर लाईटची सुद्धा सुविधा नाही. त्यामुळे लगेचच सर्वजन घरातील बॅटरीसह महिलेला झोळीतून घेऊन निघाले. मात्र पायथ्याला असणाऱ्या नावलकरवाडी येथील रुग्णालयात घेऊन जाण्यापूर्वीच जंगलातच असलेल्या एका ओढ्याच्या बाजूला झोळीमध्ये महिलेने बाळाला जन्म दिला. सुदैवाने यामध्ये महिला आणि बाळ सुखरूप आहेत अशी माहिती सुद्धा महिलेच्या पतीने दिली.

दिवसाही भीती वाटते अशा वाटेवरून रात्री झोळीतून घेऊन जावे लागले

जिथे हा धनगरवाडा आहे तिथून खाली येईपर्यंत सर्वत्र बिबट्या, अस्वल, गवारेडा, विषारी साप, हत्ती अशा जंगली वन्य प्राण्यांचा मुक्त संचार असतो. या जंगलातुन दिवसा सुद्धा जायला भीती वाटते मात्र रात्री अपरात्री अशा घटना घडतात तेंव्हा नसगरिकांनी काय करायचे असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. अनेक वर्षांपासून आम्हाला रस्त्यासाठी संघर्ष करावा लागला आहे आता तरी आमचा हा वनवास दूर व्हावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. दरम्यान, यापूर्वी सुद्धा अशाच अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, वनविभागाकडून सुद्धा आडमुठी भूमिका घेतली जाते त्यामुळे विकास साधता येत नाही अशी लोकप्रतिनिधींकडून वारंवार प्रतिक्रिया येते. मात्र आशा समस्या दूर करण्यासाठीच आम्ही आपल्याला निवडून दिले असून त्या दूर कराव्या अशी मागणी सुद्धा वारंवार होत आली आहे.

हेही वाचा -Minister Nawab Malik ED Office : नवाब मलिकांची ईडीकडून चौकशी सुरु

Last Updated : Feb 23, 2022, 11:05 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details