महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : गोकुळ दूध संघावर 'स्वाभिमानी'च्या आंदोलनाचा परिणाम; दुधाचे संकलन ५० हजार लिटरने कमी - कोल्हापूर दूध बंद आंदोलन

दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, दूध भुकटी निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देऊन केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, शिवाय दूध उत्पादनावरील 12 टक्के जीएसटी रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले. याचा गोकुळ दूध संघावर सुद्धा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.

swabhamani agitation kolhapur  swabhimani milk ban agitation  swabhimani agitation effect on gokul  गोकुळ दूध संघावर आंदोलनाचा परिणाम  कोल्हापूर दूध बंद आंदोलन  स्वाभिमानी आंदोलन कोल्हापूर
गोकुळ दूध संघावर स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम

By

Published : Jul 21, 2020, 3:08 PM IST

कोल्हापूर - संपूर्ण राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन पुकारले आहे. काही ठिकाणी टेम्पो आणि टँकरमधून दूध रस्त्यावर फेकण्यात आले आहे, तर अनेक दूध उत्पादकांनी डेअरीमध्ये दूधच घातले नाही. याचा राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघावर म्हणजेच कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावर सुद्धा परिणाम झाला आहे. जवळपास 50 हजार लिटर दूध संकलन आज कमी झाल्याची माहिती गोकुळचे कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

ईटीव्ही भारत विशेष : गोकुळ दूध संघावर स्वाभिमानीच्या आंदोलनाचा परिणाम; दुधाचे संकलन ५० हजार लिटरने कमी
दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा करावे, दूध भुकटी निर्यात करण्यासाठी प्रतिकिलो 30 रुपये अनुदान देऊन केंद्र सरकारने बफर स्टॉक करावा, शिवाय दूध उत्पादनावरील 12 टक्के जीएसटी रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध बंद आंदोलन केले. याचा गोकुळ दूध संघावर सुद्धा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आंदोलनामुळे जवळपास 50 हजार लिटर दूध संकलन कमी झाल्याची माहिती कार्यकारी संचालक दत्तात्रय घाणेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. गोकुळ दूध संघामध्ये वर्षभराच्या सरासरीनुसार जवळपास 12 लाख लिटर दुधाचे संकलन होते. मात्र, सध्या कृषकाळ सुरू आहे. त्यामुळे सध्या म्हैशीचे दूध कमी होण्याचा हा काळ आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी मिळून 10 लाख लिटर दुधाचे संकलन होत असते. त्यामध्ये 5 लाख लिटर सकाळी आणि 5 लाख लिटर सायंकाळी, असे संकलन होत असते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे जवळपास 50 हजार लिटर दुधाचे संकलन कमी झाले असल्याचेही घाणेकर यांनी म्हटले आहे....तर साडेचार लाख लिटर संकलन झाले नसते -स्वाभिमानीच्या आंदोलनाला पाठिंबा देत गोकुळ दूध संघाने एकवेळचे संकलन बंद ठेवण्यात येणार होते. मात्र, विभागीय उपनिबंधकांनी गोकुळला कारवाईची नोटीस पाठवली तसेच संकलन सुरू ठेवण्याबाबत सूचना दिल्या. त्यामुळे गोकुळने आपला निर्णय मागे घेतला. आज गोकुळ दूध संघाने संकलन बंद ठेवले असते तर आकडेवारीनुसार तब्बल 5 लाख लिटर सकाळचे दूध संकलन झाले नसते. मात्र, विभागीय उपनिबंधकांनी पाठविलेल्या नोटीसनंतर संकलन सुरू ठेवावे लागले. त्यामुळे जवळपास साडेचार लाख लिटर दुधाचे संकलन झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details