महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 10, 2020, 10:26 AM IST

ETV Bharat / state

'मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सरकारला वाटतच नाही'

कोल्हापूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मराठा आरक्षणाच्या विषयावरून राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे सरकारला वाटतचे नसल्याचा आरोप केला आहे.

Samarjeetsinh Raje Ghatge criticize maharashtra government for maratha reservation
'मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे सरकारला वाटतच नाही'

कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या विषयावर सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. आरक्षणावरील स्थगितीबाबत सर्वोच्च न्यायालयात जी सुनावणी झाली. त्यावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते. सुनावणीपूर्वी आमची पूर्ण तयारी झाली आहे असे सरकारकडून वारंवार सांगितलं गेले. मात्र सरकारने मराठा समाजाची कुठंतरी थट्टा केली आहे. त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे वाटतचं नसल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. काल बुधवारी सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावरील स्थगितीबाबत सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरक्षणावरील स्थगित कायम ठेवली असून 25 तारखेला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

समरजितसिंह घाटगे बोलताना....
मराठा समाजाला आरक्षण मिळावे असे यांना वाटतच नाही - समरजितराजेअजूनही मराठा समाज शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आरक्षण मागत आला आहे. मात्र आता सरकारला त्यांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागणार आहे. सरकार केवळ आम्ही काहीतरी करत आहे. हे फक्त दाखवण्यासाठी सोंग करत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे यांना वाटतच नाही, असा आरोप सुद्धा समरजितसिंह घाटगे यांनी केला आहे. चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला निषेध तर संभाजीराजे म्हणाले खुलासा करा -सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणावरील स्थगितीबाबत सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने आरक्षणावरील स्थगित कायम ठेवली असून 25 तारखेला यावर पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष यांनी सरकारवर निशाणा साधत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून आपण न्यायालयात कोणतेही कर्तृत्व दाखवले नाही. उलट आपली नाचक्की झाली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवाय संभाजीराजेंनी सुद्धा सुनावणी नंतर नाराजी व्यक्त करत आपण न्यायालयात चांगल्या पद्धतीने बाजू मांडत होतो तर पुढची तारीख का मागितली याचा सरकारने खुलासा द्यावा असे म्हटलं आहे. हेही वाचा -राजू शेट्टींकडून कृषी कायद्यांची होळी; म्हणाले, शेतकरी एकटा नाहीये हे बंदमधून समजलं

ABOUT THE AUTHOR

...view details