महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सात बारा कोरा करण्याचे सरकारचे उद्दिष्ट पूर्ण झाले नाही' - राजू शेट्टी बातमी

कर्जमाफीची आज जी घोषणा करण्यात आली, त्यात केवळ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्याच थकबाकीदारांचे कर्ज माफ होणार आहे. महापूर, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र, त्यांच्यासाठी काहीच उपाययोजना केल्या नाहीत, अशी टीका शेट्टींनी केली.

raju shetty
राजू शेट्टी

By

Published : Dec 21, 2019, 5:54 PM IST

Updated : Dec 21, 2019, 7:26 PM IST

कोल्हापूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेमध्ये आज शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली आहे. सरकारने शेतकऱ्यांचे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतचे थकीत कर्ज माफ करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर बोलताना राजू शेट्टी यांनी सरकारचे सात बारा कोरा करण्याचे उद्दिष्ट साध्य झाले नाही, असे मत व्यक्त केले आहे.

राजू शेट्टी

हेही वाचा-गुगलमध्ये सुंदर पिचाईंचे 'नवे युग'; दुप्पट वेतनासह कोट्यवधी रुपयांचे मिळणार शेअर

कर्जमाफीची आज जी घोषणा करण्यात आली, त्यात केवळ ३० सप्टेंबर २०१९ पर्यंतच्याच थकबाकीदारांचे कर्ज माफ होणार आहे. महापूर, अतिवृष्टी आणि दुष्काळामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. शेतकऱ्यांचे यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात पिकांचे नुकसान झाले आहे. त्या पिकांसाठी कर्ज काढले आहे. त्यामुळे ज्यांचे या महापुराने आणि दुष्काळाने नुकसान झाले आहे त्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या कर्जमाफीमुळे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली म्हणता येणार नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये देण्याबाबत काहीच निर्णय नाही, अशीही टीका राजू शेट्टींनी केली.

Last Updated : Dec 21, 2019, 7:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details