महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तुमच्या प्रचाराला यायचं आहे, असे पर्रिकर म्हणाले होते - राजू शेट्टी

माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धाजंली वाहिली.

By

Published : Mar 18, 2019, 4:31 AM IST

कोल्हापूर

कोल्हापूर - माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या शोकभावना व्यक्त केल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही शोक व्यक्त करत श्रद्धाजंली वाहिली.

राजकीय क्षेत्रात राहुन देखील स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही शिंतोडा उडू न देणारे व अत्यंत साधेपणा, सहज असलेले माझे परममित्र व मार्गदर्शक गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाचे वृत मनाला न पटनारे असून हे सत्य रुचविणे अतिशय क्लेशकारक आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी एक फोन आला, पलिकडून गोव्याचे मुख्यमंत्री बोलणार असे सांगितले व मनोहरजींनी राजू शेट्टी का असे विचारले, मी हो नमस्कार साहेब, असे बोललो. त्यांनी पलिकडून मला तुमच्या प्रचाराला यायचे आहे, असे सांगितले व तीन चार सभांचे वेळापत्रक देण्यास सांगून इचलकरंजी येथे सभेस त्यांनी उपस्थिती लावली.

मला आश्चर्य वाटले, ते म्हणाले की, तुम्ही असे एकमेव आहात की ज्यांना मतदार स्वत:च्या खर्चाने निवडून देतो. त्यानंतर अनेक वेळी संवाद झाले, त्यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळत राहिले. असा सरळ, स्वच्छ व आदर्श नेता होणे नाही. राजकारणाच्या गटार-गंगेत राहुन देखील आपले हात निर्मळ व स्वच्छ ठेवणाऱ्या मनोहरजींना स्वाभिमानी पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रदांजली, असे राजू शेट्टी यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details