महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 6:41 PM IST

ETV Bharat / state

जरांगेंच्या उपोषणाच्या पूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळणार - हसन मुश्रीफ यांचा दावा

Maratha Reservation : 20 जानेवारीपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

Maratha Reservation
हसन मुश्रीफ

हसन मुश्रीफ यांची पत्रकार परिषद

कोल्हापूरMaratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेनं कुच करणार आहेत. त्यामुळं सरकारला काही अवधी मिळाला आहे. जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. यासाठी सध्या तयारी सुरू आहे. मात्र, त्याआधीच मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय, ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधत होते.

जरांगेंच्या उपोषणापूर्वीच मिळेल आरक्षण :मराठा आरक्षणासारखा गुंतागुंतीचा प्रश्न सोडवण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेनं 20 जानेवारीला निघणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारला 24 डिसेंबरची मुदत दिली होती. त्यानंतर त्यांनी बीडमधील सभेत मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईत आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, त्यापूर्वी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल, असा दावा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.

'भारत न्याय यात्रा' परिणाम होणार नाही : काँग्रेस नेते राहुल गांधी 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई 'भारत न्याय यात्रा' काढणार आहेत. याआधी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली होती. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची केवळ एकाच राज्यात सत्ता आली, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. काँग्रेसच्या या यात्रेचा जनतेवर काहीही परिणाम होणार नाही, असं देखील मुश्रीफ यांनी म्हटलंय.


कोल्हेंबाबत अजित पवार करणार खुलासा : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंबाबत अजित पवार खुलासा करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेतली. अजित पवारांच्या शपथविधीला शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची देखील उपस्थित होती. त्यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री अजित पवारांची माझ्या समक्ष भेट घेतलीय. सद्यस्थितीत अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यात दुरावा का वाढला, याबाबत अजित पवारच सांगू शकतील, असं मंत्री मुश्रीफ म्हणाले.

कोल्हापूरच्या हद्दवाढीला विरोध : कोल्हापूरची हद्दवाढ विधानसभा, लोकसभा निवडणुकीपर्यंत शक्य नाही. कोल्हापूरचा हद्दवाढ प्रश्न गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ प्रलंबित आहे. कोल्हापूर शहराजवळील काही गावं हद्दवाढीला विरोध करत आहेत. त्यांचीही समजूत काढू. मात्र, लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत हद्द वाढ होणं शक्य नाही, असं स्पष्टीकरण पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिलं.


हेही वाचा -

  1. प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर दिसणार का महाराष्ट्राचा चित्ररथ? प्रशासनानं दिलं 'हे' उत्तर
  2. INDIA आघाडी तुटण्याच्या मार्गावर? शिवसेना महाराष्ट्रात २३ जागांवर ठाम, ममता बॅनर्जींचा बंगालमध्ये एकला चलोचा नारा
  3. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांचा राजीनामा, नितीश कुमार यांच्या हाती पुन्हा पक्षाची धुरा

ABOUT THE AUTHOR

...view details