महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आम्हाला आमच्या घरी पाठवा, कोल्हापुरात शेकडो मजूर रस्त्यावर - कोल्हापूर लॉकडाऊन परिणाम

गेल्या 15 दिवसांपासून खाण्याची गैरसोय होत आहे. मालकांनी सुद्धा पगार देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, या एकाच मागणीवर ते अडून आहेत. कोल्हापूरच्या दिशेने येत असलेल्या मजुरांना तावडे हॉटेल येथे अडवून त्यांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.

kolhapur latest news  कोल्हापूर लेटेस्ट न्युज  labor gathered on road kolhapur  शेकडो मजूर रस्त्यावर कोल्हापूर  कोल्हापूर लॉकडाऊन परिणाम  kolhapur lockdown effect
आम्हाला आमच्या घरी पाठवा, कोल्हापुरात शेकडो मजूर रस्त्यावर

By

Published : May 14, 2020, 1:54 PM IST

Updated : May 14, 2020, 2:26 PM IST

कोल्हापूर - गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापुरातून परराज्यात रेल्वे सोडण्यात येत आहेत. आत्तापर्यंत 3 रेल्वे परराज्यात सोडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आम्हाला सुद्धा घेऊन जा म्हणत आज शेकडो मजूर महामार्गावर उतरले. येथील शिरोली एमआयडीसीमध्ये काम करणारे हे मजूर असून कोणत्याही परिस्थितीत आम्हाला आमच्या मूळ गावी परत सोडण्याची मागणी त्यांनी केली आहे.

आम्हाला आमच्या घरी पाठवा, कोल्हापुरात शेकडो मजूर रस्त्यावर

गेल्या 15 दिवसांपासून खाण्याची गैरसोय होत आहे. मालकांनी सुद्धा पगार देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, या एकाच मागणीवर ते अडून आहेत. कोल्हापूरच्या दिशेने येत असलेल्या मजुरांना तावडे हॉटेल येथे अडवून त्यांना पोलीस समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवाय जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सुद्धा घटनास्थळी भेट देऊन मजुरांना समजावण्याचा प्रयत्न करून तुम्हा सर्वांना लवकरच आपल्या गावी पाठविण्याची सोय करण्यात येईल, असे आश्वस्त केले आहे. गेल्या तीन दिवसांत कोल्हापुरातून मध्यप्रदेश, बिहार आणि उत्तरप्रदेश अशा तीन राज्यांमध्ये जवळपास 4 हजार मजूर रेल्वेने पोहोचवण्यात आले आहेत. त्यामुळेच हे मजूर रस्त्यावर आले असून आपापल्या गावी जाण्यासाठी आक्रमक झाले आहेत.

Last Updated : May 14, 2020, 2:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details