महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 16, 2021, 9:22 PM IST

ETV Bharat / state

पोलिसांची 'मिशन संवेदना' टीम वाड्या-वस्त्यावरील धनगरवाड्याच्या मदतीला

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून जनतेच्या मदतीसाठी 'मिशन संवेदना' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्याकडून धान्य स्वरूपात मदत घेवून गरजू व्यक्तींना वाटप करण्यात येते.

पोलिसांनी धान्य वाटप
पोलिसांनी धान्य वाटप

कोल्हापूर- जंगलातील रानमेवा विकून पोटे भरणाऱ्या लोकांचे कोरोनाने कंबरडे मोडले आहे. संचारबंदी, लॉकडाऊन यामुळे रानमेवा विकला जात नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळी कोल्हापूर पोलिसांची 'मिशन संवेदना' टीम वाड्यावस्तीवर पोहोचून डोंगर कपऱ्यातील धनगरवाडे शोधून त्यांना मदत करण्याचे काम करत आहे.

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून जनतेच्या मदतीसाठी 'मिशन संवेदना' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती, सामाजिक संस्था यांच्याकडून धान्य स्वरूपात मदत घेवून गरजू व्यक्तींना वाटप करण्यात येते. या संकल्पनेतून गगनबावडा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील बावेलीपैकी धनगरवाडा, जर्गीपैकी धनगरवाडा आणि शेळोशीपैकी धनगरवाडा येथील लोक रानमेवा विकून पोट भरतात. परंतु सद्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज (रविवारी) दानशुर व्यक्ती आणि सामाजिक संस्थेकडून मिळालेल मदत गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांनी ३५ कुटुंबांना तांदुळ, गहु व डाळ अशा स्वरुपात वाटप केली. तसेच सदर उपक्रमांतर्गत गगनबावडा तालुक्यामधील परराज्यातील १५ कुटुंबांनाही धान्य वाटप केले. तिसंगी, किरवे, निवडे व वेस येथील ३५ गरजू व गरीब कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले. असे एकूण १०० कुटुंबांना धान्य वाटप करण्यात आले आहे.

रानमेवा विकून उदरनिर्वाह पण...

गगनबावडा तालुका हा अतिशय दुर्गम भागात मोडलेला आहे. येथील अनेक धनगरवाड्यांवर पुरेशी वाहतूक व्यवस्था नाही. येथील लोकांचा उदरनिर्वाह केवळ जंगलातील रानमेवा विकून होतो. मात्र वारंवार सुरू असलेली संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे रानमेवा विकायचा कुठे? आणि कारवाई झाली तर पैसे कुठून आणायचे? हा प्रश्न येथील लोकांना आहे. त्यामुळे अनेकजण गेल्या वर्षभरापासून आपल्या वाड्या-वस्तीवरच काम करत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. अशावेळी पोलीस मदतीला धावून आल्याने 'सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय' ही बाब खरी ठरली आहे.

'वाड्या-वस्तीवर मदत करावी' -

वाड्या-वस्तीवरील लोकांचे उपजिविकेचे साधन म्हणजे निसर्ग आहे. निसर्गातील पिकलेले फळे, सुकावेमा, रानमेवा शहरात विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद आहे. गेल्या वर्षभरापासून हलाखीची परिस्थिती आहे. त्यामुळे दानशूर व्यक्तींनी शहारासोबत वाड्यावस्तीवर मदत करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details