महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जोतिबाची यात्रा रद्द - Kolhapur District Latest News

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आल्याने याचा फटका या परिसरातील अनेक लहान मोठ्या व्यवसायिकांना बसला असून, कोट्यावधिची उलाढाल ठप्प झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जोतिबाची यात्रा रद्द
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही जोतिबाची यात्रा रद्द

By

Published : Apr 26, 2021, 4:31 PM IST

कोल्हापूर -राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाही दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या जोतिबाची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रा रद्द करण्यात आल्याने याचा फटका या परिसरातील अनेक लहान मोठ्या व्यवसायिकांना बसला असून, कोट्यावधिची उलाढाल ठप्प झाली आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, गुजरात, गोवा, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यातील लाखो भाविक यात्रेनिमित्त जोतिबाच्या डोंगरावर गर्दी करत असतात. जोतिबाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. या दिवशी देवाच्या दर्शनासाठी जोतिबा डोंगरांवर लाखो भाविक हजेरी लावत असतात. जोतिबाच्या नावानं चांगभलं ! दख्खनचा राजा जोतिबा माझा म्हणतं देशभरातले भाविक याठिकाणी येतात. गुलाल खोबऱ्याची उधळण करत ढोल आणि हालगीच्या तालावर मशाली नाचवल्या जातात. सासनकाठी नाचवणारे भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेतात. मात्र याही वर्षी गेल्या वर्षीप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या सर्वच वाहनांवर बंदी घातली आहे. शिवाय डोंगराकडे जाणाऱ्या सर्वच मार्गावर पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे डोंगर परिसरात पूर्णतः शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

मानकऱ्यांमधील 5 जण कोरोना पॉझिटिव्ह

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दख्खनच्या राजाची यात्रा यंदा देखील रद्द करण्यात आली आहे. भाविकांना जोतिबाच्या दर्शनासाठी जाण्यास मनाई करण्यात आल्याने, मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये ही यात्रा होणार होती. पुजाऱ्यासह केवळ 21 लोकांच्या उपस्थितीमध्येच सर्व कार्यक्रम पार पडणार होते. मात्र या 21 पैकी 5 जण कोरोनाबाधित आढळून आल्याने यात्राच रद्द करण्यात आली आहे.

कोट्यावधिची उलाढाल ठप्प

जोतिबाच्या यात्रेनिमित्त दरवर्षी देशभरातून लाखो भाविक जोतिबा डोंगरावर येत असतात. या यात्रेवर हजारो छोटे-मोठे व्यवसाय अवलंबून असतात. यात्रा जवळपास पाच ते सहा दिवस सुरू असते. त्यामुळे अनेक छोटे-मोठे व्यापारी मालाची साठवणूक करून मोठी गुंतवणूक करत असतात. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ही यात्रा बंद असल्याने, त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यवसायिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

हेही वाचा -गडचिरोलीतील अहेरी तालुक्यात नक्षलवाद्यांनी केली जाळपोळ

ABOUT THE AUTHOR

...view details